नवीन लेखन...

इये मुंबईचिये नगरी .. मध्यरंग (सन – १९९५)

मुंबईची कथा आणि व्यथा सांगणारी ही कविता श्री द्वारकानाथ शंकर उर्फ जयंत वैद्य यांनी सर्वप्रथम १९८२ साली लिहिली. जसजसा काळ पुढे गेला तसे संदर्भ बदलले, मुंबईसुद्धा बदलली. या कवितेचा हा मध्यरंग १९९५ मध्ये लिहिला गेला.व्यवस्थापन सल्लागार असलेले श्री वैद्य हे अवघे पाउणशे वर्षाचे तरुण आहेत. त्यांचे नजिकचे मित्र त्यांना DS या टोपणनावाने संबोधतात.

 

मध्यरंग (सन – १९९५)

पूर्वार्ध संपला तपापुर्वी महागाई गेली गगनापरी
पार्किंग स्पेसचे भाव, लाखापरी मुंबापुरीत वाढले ।।४२।।

वाशी आली मध्यावरी निर्माण झाली नवीन नगरी
दोन्ही मिळून अरबी सागरी नटून राहती की नवनवरी ।।४३।।

वांद्रा – कुर्ला नवीन कॉम्प्लेक्स आयडीबीआय अन् हिरे कक्ष
आयएसडी, एसटीडी अन् फॅक्स सर्वदा सेशी दक्ष ।।४४।।

आतंर्देशी कंपन्यांचे जाळे व्यापून टाकिती अवघेचि गाळे
मुंबापुरीची पोरे-बाळे निर्वासीत जाहली ।।४५।।

समाजवाद बुडाला सागरा अंतरी थैली बहाद्दरांची जाणावी मातब्बरी
डॉलर, मार्क अन् येनाची थोरवी मनोमनी साठवावी ।।४६।।

नवीन जगाचे नवीन नियम जगी असेना काहीच कायम
आयुष्याची दोरी भरभक्कम कधी न सोडावी रोकडी रक्कम ।।४७।।

जगणे हेचि आपुले गाणे नोकरीसमवेत पैसे खाणे
दिनरात देशचिंता करणे उदंड भरल्या उदरी ।।४८।।

हेचि असावे नवीन तत्त्वज्ञान पसापसा मागणे हीच खरी शान
आपण थोर सरकार चोर सर्वकाळ सर्वांशी सांगणे ।।४९।।

आपण स्वच्छ धर्मासारखे बाकी मात्र महाबेरके
शिव्या देण्यात म्होरके मास्तर, प्राध्यापक वा वार्ताहर ।।५०।।

स्वचक्षुतील झाकावे मुसळ पराचे दाखवावे कुसळ
यातचि मानावे भूषण जन सामान्य मानसी ।।५१।।

मुंबापुरी वाढती दाही दिशा कर्जत, कसारा वा पालघरच्या कक्षा
न करावी जागेची उपेक्षा महामुंबई नगरी ।।५२।।

अशातही राहती जे खरे ताठ ठकाठकांची पडे गाठ
उद्धटासि उद्धट सान थोर अन् भाट ।।५३।।

कोण थोर अन् कोण चोर कोण भा; अन् कोण उद्धट
पुंजी साठवावी फटाफट भारताच्या अर्थनगरी ।।५४।।

पैसे करणे हेचि असावे ध्येय पैसे खाणे आपले पांथेय
करावा ना कामाचा व्यय मिळे जिथे ना खाण्यास काही ।।५५।।

असो असो हे व्याख्यान मुंबई नगरीचे आख्यान
जयंते करितसे निरुपण जोडोनी दोन्ही कर वंदन ।।५६।।
असंच आपलं इकडलं तिकडलं

एक होता राजा त्याची काय मजा
त्यानं खाल्ला काऊ पोटात झाला बाऊ ।।१।।

एक होती मनीमाऊ तिचा काळा काळा भाऊ
त्याचं झालं लग्न मनी आपली खाण्यात मग्न ।।२।।

लाल लाल टोमॅटो अंगाने जाडजूड
त्याला भेटली मिरची गेला त्याचा मूड ।।३।।।

एक होती गाय तिला चार पाय
एका पायाने लंगडी शिंगात घाली बांगडी ।।४।।

उंदराच्या पाठीवर हत्ती झाला स्वार
हलेना बोलेना त्यानं खाल्ला मार ।।५।।

सिंहाच्या आयाळात लपून बसली ऊ
वाघाला वेडावते तुझी माझी गट्टी फू ।।६।।

आंब्याच्या वनामध्ये मोर झाला राजा
लांडोर मागून नाचते हीच त्याला सजा ।।७।।

वांदरात वांदर काला बंदर
नाकात घाली डूल कानानी हुंगी फूल ।।८।।

या कवितेचा उत्तर रंग २०१० मध्ये लिहिला गेला. संदर्भ बदलले, मुंबईसुद्धा बदलली.

कशी ते वाचा.. उत्तर रंग मध्ये

— द्वारकानाथ शंकर (जयंत) वैद्य

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..