नवीन लेखन...

आयुष्यावर बोलू काही !!!

आयुष्य हे जगायचं असतं
क्षण आणि क्षण अनुभवायचं असतं………..!!

कधी तरी रडायचं असतं,
कधी कधी हसायचं असतं………………….!!

मुलं मोठी होतात तशी, त्यांच्या कलानं घ्यायचं असतं,
सुनबाई घरात आल्यावर तर नातं आणि नातं जपायचं असतं………..!!

बालपणीच्या आठवणींवर आयुष्य हे पुढे ढकलायचं असतं,
मोठेपण आल्यावर,
त्याच आयुष्याला अनुभवाचं गाठोडं बांधायचं असतं……..!!

बोलताना जिभेला हाड नसल्याची जान ठेवायचं असतं,
हातपाय गलितगात्र न होतील,
ह्याचही भान राखायचं असतं……..!!

मनाच्या कप्प्या-कप्प्यांवर साचलेल्या जुनाट विचारांना
दूरवर फेकायचं असतं,
आयुष्यभर जपलेल्या हितकारक संस्कारांवर
उभं आयुष्य काढायचं असतं…………!!

आयुष्य हे लढायचं असतं, आयुष्य हे कुढायचं नसतं,
आयुष्य हे येईल त्या प्रसंगांना सामोरं न्यायचं असतं……..!!
आयुष्य हे रणांगणातून पळ काढायचं नसतं,
नको त्या प्रसंगांना टाळायचं असतं………!!

कधी कधी माघार घेवूनसुद्धा,
आयुष्याच सोनं करायचं असतं……..!!

— श्री.मयुर गंगाराम तोंडवळकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..