नवीन लेखन...

अक्षयतृतीये निमित्त संकल्प करा

अक्षय तृतीयेला कृत युग संपून त्रेतायुग सुरू झाले असे सांगितले जाते. या दिवशी दुसऱ्या युगाला सुरुवात झाली होती.ही समजूत जुनी असली तरीही आपण यातून काही शिकण्यासारखे नक्कीच आहे.केशवसूतांच्या ‘जुने जाऊ द्या मरणालागुन’ या उक्तीप्रमाणे आपणच घालून दिलेल्या चौकटी, रूढी-परंपरा, रीतीरिवाज वेळोवेळी बदलत्या काळाच्या कसोटीवर तपासून घ्यायचे काम समाजपुरुषाने करायचे असते.त्यामुळे वर्षभर आलेले अपयश झटकून नव्या जोमाने अभ्यासाला लागा.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे मशागत करण्याचे काम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूर्ण करायची प्रथा आहे.कोकणात या दिवशी शेतात बियाणे पेरण्याची प्रथा आहे, देशावर नाही. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही, अशी समजूत आहे.त्यामुळे विद्यार्थी मित्रहो, आजपासून पुन्हा अभ्यासाला लागा.आज केलेला अभ्यासाला क्षय लागणार नाही.कारण हा सन अक्षय आहे.

अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात अशी समजूत आहे.म्हणूनच संकल्प करा आज मी स्वत:ला अभ्यासात रुजवून घेणार आहे.व यंदा यशाची गोड फळे नक्कीच चाखणार आहे.

Avatar
About दीपक गायकवाड 33 Articles
दीपक गायकवाड हे महाराष्ट्रातील पहिली ऑनलाईन स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी- "आदित्य ॲकॅडमी" चे क्रिएटिव्ह डायरेक्टर तथा संस्थापक आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..