J-021

दोन प्रसिद्ध लेखक एकदा एका समारंभात भेटतात. त्यापैकी बाबुराव सरदेशपांडे यांना दुसऱयाची फिरकी घेण्याची सवय होती. ते काकासाहेब जोशींना म्हणाले, “परवाचा तुमचा लेख वाचला पण फारच भिकार वाटला.” काकासाहेब म्हणाले,“मग भिकार लेख लिहिण्याचा मक्ता काय फक्त तुम्हीच घेतलाय ?”