राजीव तांबे
युनिसेफ आणि इतर काही सामाजिक संस्थांसोबत काम करताना त्यांनी राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील अनेक शाळांना भेट दिली आहे. […]
कथाकार
युनिसेफ आणि इतर काही सामाजिक संस्थांसोबत काम करताना त्यांनी राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील अनेक शाळांना भेट दिली आहे. […]
प्रा.रंगनाथ पठारे यांचे आजच्या मराठी साहित्यात अव्वल स्थान आहे. श्रेष्ठ दर्जाचे कादंबरीकार, कथाकार, समीक्षक आणि विचारवंत म्हणून गेली ४० वर्षे ते अविरतपणे योगदान देत आलेत. सुमारे चाळीस हून अधिक मौलिक ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. कथा आणि कादंबरी या दोन्ही साहित्यप्रकारांत ते लेखन करतात. […]
कथा, पटकथा, संवाद लेखक व कलाकार प्रदीप कबरे हे मुळातच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. अभिनेता म्हणून त्यांनी नाव कमावलं आहेच, पण लेखक म्हणूनही कामगिरी केली आहे. त्यांनी आत्तापर्यंत दोन नाटकं लिहिली आहेत. तसंच अंदाजे अडीच हजार रेडिओ कार्यक्रम लिहिले आहेत. पाच हजारांहून अधिक रेडिओ कार्यक्रमांचं सादरीकरण केलं आहे. सहा-सात माहितीपटांचं लेखन केलं आहे. शंभरेक जिंगल्स लिहिल्यात. दोन चित्रपटांची कथा-पटकथा-संवाद लिहिले आहेत. एका चित्रपटासाठी गीतलेखनही केलं आहे. […]
६ नाटके, २ प्रवासवर्णन, २ व्यक्तिचित्रे, २८ कथासंग्रह, १८ लेखसंग्रह, निवडक कथा संग्रहाचे दोन भाग इतके त्यांचे साहित्य प्रसिद्ध झाले. […]
कुसुम अभ्यंकरांची दुसरी ओळख म्हणजे त्या रत्नागिरीच्या मतदारसंघातून १९७८ साली आमदार म्हणून निवडून आल्या. त्या काळात खेडोपाडी फिरून त्यांनी आपल्या मतदारांच्या अडीअडचणींकडे जातीने लक्ष पुरवले. उत्तम वक्तृत्वाची कला त्यांच्याजवळ होती. त्यामुळे माणसांशी संवाद साधून माणसे जोडण्याचे कसब त्यांनी साध्य केले होते. […]
कथा, कादंबरी, प्रवासवर्णन, नाटके असा लेखणीसंचार ताकदीने करणारे जयवंत द्वारकानाथ दळवी. साहित्यक्षेत्राला विनोदी फटके लगावणारा “ठणठणपाळ” या टोपण नावानेही त्यांनी लेखन केले. […]
डॉ. वामन दामोदर गाडगीळ हे कथा-कादंबरीकार होते. […]
कादंबर्या, नाटके, कथा आदी लिहून पुढे समीक्षेत लौकिक मिळवणारे संपादक व समीक्षक विष्णू बापूजी आंबेकर […]
कथा-कादंबरीकार प्रा. रावसाहेब रंगराव बोराडे यांचा २५ डिसेंबर १९४० रोजी जन्म झाला. ‘पेरणी, मळणी, राखण, खोळंबा’ मिळून १५ कथासंग्रह. तसेच ‘पाचोळा, सावट, चारापाणी, आमदार सौभाग्यवती’ या कादंबर्या. ‘पिकलं पान, विहीर’ ही नाटके आणि काही बालसाहित्य त्यांच्या नावावर […]
कथाकार, कादंबरीकार व कवी “बी. रघुनाथ” म्हणजेच भगवान रघुनाथ कुलकर्णी. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी ७ कादंबर्या ६० कथा आणि १५० च्या आसपास कविता लिहिल्या होत्या. अवघ्या ४० व्या वर्षी ७ सप्टेंबर १९५३ रोजी त्यांचे निधन झाले. Bhagwan […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions