पाळंदे, भास्कर

ठाणे शहराचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी पुर्वीपासून येथे साहित्यिक, नाटयकर्मी, संगीतकार, शिक्षणतज्ञ, संशोधक, व इतर कलाप्रेमी रथी महारथींची रेलचेल आहे. या शहराचा सांस्कृतिक व साहित्यिक ज्ञानबिंदू उंचवण्यात जुन्या काळातील म्हणजे साधारण १९ व्या शतकाच्या पुर्वार्धातील, प्रसिध्द कवी भास्कर दामोदर पाळंदे यांचं महत्त्वाचं योगदान होतं.

मूळ ठाण्याचे रहिवाशी असलेल्या भास्कर पाळंदे आपल्या परिसरातील स्थानिकांना आपल्या रसभरित व जातीवंत कवितांनी मंत्रमुग्ध करून, रसिकतेचा दरवळणारा पारिजात आपल्या वाचकांच्या सामुहिक मनांमध्ये दीर्घकाळ फुलवून ठेवला होता. इंग्रज राजवटीत ते न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. भास्कर पाळंदे यांनी “विक्रमोर्वशीयम्” या संस्कृत नाटकाचे गद्यपद्यात्मक व गीतेचे ओवीबध्द भाषांतर केले आहे. त्यांनी लिहीलेल्या “रत्नमाला” या प्रसिध्द भक्तीपर पद्यग्रंथाचे वाचन करताना सर्वसामान्य व्यक्ती गहिवरून जातो.

दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*