कोकणातले रातांबे (कोकम)

आंबा, काजू आणि फणस म्हणजे कोकणचा मेवा. या मेव्यात आणखी एक फळ आहे जे कोकणी माणसाचा जीव की प्राण आहे. ते म्हणजे रातांबे. आलुबुखारसारख्या दिसणार्‍या जांभळट गोल आकाराच्या रातांब्यापासून कोकम, आगळ, कोकम सरबत आणि तेल […]

भारतीय अभियांत्रिकीचा आविष्कार – कोकण रेल्वे

एकेकाळी अत्यंत कठीण आणि अशक्य वाटत असलेले कोकणवासियांचे एक स्वप्न प्रत्यक्षात आले ते कोकण रेल्वेच्या उभारणी नंतर. भारतीय अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट आविष्कार म्हणजे कोकण रेल्वे. अत्यंत कठीण आणि खडतर भागातून या रेल्वेमार्गाची ऊभारणी करण्यात आली. यासाठी प्रथमच कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना करण्यात आली. या महामंडळाच्या प्रमुकपदी ई. श्रीधरन नावाचे अत्यंत कायर्क्षम अधिकारी नेमण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय अभियंत्यांनी हे शिवधनुष्य अत्यंत लिलया पेलले आणि  मुंबईपासून थेट दक्षिण भारतात जाण्यासाठी हा मार्ग सुरु झाला. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग या पाचही जिल्हातून जाणार्‍या कोकण रेल्वेचे […]

लोकमान्यांचे जन्मस्थळ रत्नागिरी

रत्नागिरी हे कोकणातील महत्त्वाचे शहर आहे. येथील किल्ला प्रसिध्द असून, तो विजापूरच्या आदिलशहाने बांधलेला आहे. देशाच्या पश्विम किनार्‍यावर वसलेले या शहरातील बंदर प्रसिध्द आहे. येथील थिबा पॅलेस, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी स्थापन केलेले पतितपावन […]

रत्नागिरी जिल्हा

निर्मळ, स्वच्छ, सुंदर समुद्र किनारे व हापूस आंबे, काजू, नारळी, पोफळीच्या बागा यांनी संपन्न असलेला जिल्हा म्हणजे रत्नागिरी. या जिल्हयाला निसर्गाने जणू काही अप्रतिम सौंदर्यच बहाल केले आहे. म्हणून हा जिल्हा पर्यटनदृष्ट्या अतिशय महत्वाचा जिल्हा […]

रत्नागिरी जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

भात’ हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. लागवडीखालील एकूण जमिनीपैकी साठ टक्क्यांहून अधिक जमीन भाताखाली आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात डोंगरउतारावर नाचणीचे पीक घेतात. संगमेश्वर व चिपळूण हे तालुके नाचणीच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.दापोली, गुहागर, राजापूर […]

रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

लोकमान्य टिळक – लोकमान्य टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ साली याच जिल्ह्यातील चिखलगाव येथे झाला. त्यांना भारतीय असंतोषाचे जनक आणि तेल्या तांबोळ्यांचे पुढारी असे म्हणत. सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती हे उत्सव साजरे करण्यास त्यांनी […]

रत्नागिरी जिल्ह्यातील लोकजीवन

रत्नागिरीची लोकसंस्कृती स्वभावतः कोंकणी असून जिल्ह्याचा अभिमानास्पद इतिहासाचे प्रतिबिंब येथील संस्कृतीत दिसून येते. अनेक शैक्षणिक संस्था आणि उद्योगांचे माहेरघर असलेले रत्नागिरी, व्यापार आणि निवासासाठी सोयीचे ठिकाण मानले जाते.

रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक माहिती

महाराष्ट्राच्या कोंकण किनारपट्टीत नैऋत्येला रत्नागिरी जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा, पूर्वेस सातारा जिल्हा व सांगली जिल्हा तर उत्तरेस रायगड जिल्हा आहे. रत्नागिरी शहर हे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. या जिल्ह्याची […]

रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

थिबा पॅलेस –  हे रत्नागिरी शहरातील प्रमुख आकर्षण आहे. या ९७ वर्षांच्या जुन्या राजवाड्याचे ब्रह्मदेशाच्या इतिहासाशी नाते आहे. ब्रह्मदेशात ७ वर्षे सत्ता गाजविलेल्या राजा थिबा याची राजवट इ.स. १८५५ मध्ये ब्रिटिशांनी उलथवली. २७ एकर आणि […]

रत्नागिरी जिल्ह्यातील दळणवळण सोयी

मुंबई-पणजी-कोची हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ या जिल्ह्यामधून जातो. हा मार्ग मुंबई-गोवा महामार्ग या नावाने परिचित आहे. सातारा जिल्ह्याला जोडणारा कुंभार्ली घाट, रायगड जिल्ह्याला जोडणारा कशेडी घाट व कोल्हापूरला जोडणारा आंबा घाट हे महत्त्वाचे घाट […]

1 2 3