बुटीबोरी – सर्वात मोठी औद्योगिक वसाहत

महाराष्ट्राची  उपराजधानी असलेल्या नागपूर शहरानजीक असलेली बुटीबोरी औद्योगिक वसाहत ही आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे. आग्रेय व मध्यपूर्व आशियातील सामान वाहतुकीसाठी महत्त्वाचा थांबा येथे बनणार आहे. या वसाहतीत आतापर्यत ५ हजार कोटींपेक्षा जास्त […]

सातार्‍याचा अजिंक्यतारा

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा शहराला ऐतिहासिक वारसा आहे. मराठेशाहीच्या काळात सातारा हे राजधानीचे ठिकाण बनले होते. महाराणी ताराबाई यांच्या काळात येथूनच राज्यकारभाराची सूत्रे हलत. शिलहार वंशातील राजा दुसरा भोज याने इ.स.११९० मध्ये येथे अजिंक्यतारा हा किल्ला […]

थेऊरचा श्री चिंतामणी

थेऊरचा श्री चिंतामणी हासुद्धा अष्टविनायकातला एक गणपती. थेऊर हे पुणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक गाव आहे.  ब्रम्हदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले, अशी अख्यायिका आहे. पुणे-सोलापुर महामार्गावर हडपसरच्या नंतर लोणीच्या पुढे ३ […]

महडचा श्री वरद विनायक

महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी हा गणपती. हे स्वयंभू स्थान आहे. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची पूर्वाभिमुख मूर्ती सिंहासनारूढ आहे. या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. […]

थंड हवेचे ठिकाण माथेरान

मुंबईपासून सर्वात जवळ असलेले आणि सहजपणे जाता येणारे थंड हवेचे ठिकाण म्हणजे माथेरान.  सह्याद्रीच्या डोंगररांगात असलेले हे छोटेखानी गाव इंग्रजांच्या काळातील बंगल्यांनी नटलेले आहे. मुंबई-पुणे लोहमार्गावर कर्जतच्या अलिकडे असलेल्या नेरळ या स्थानकावरुन माथेरानला जाण्यासाठी मिनी ट्रेनची व्यवस्था आहे.  माथेरानमध्ये इंधनावर चालणार्‍या गाड्यांना पूर्णपणे मज्जाव आहे. त्यामुळे संपूर्ण गावात फक्त पायवाट किंवा घोड्यावर बसून जावे लागते. १८५४ मध्ये सर मॅलेटने माथेरान या थंड हवेच्या ठिकाणाचा शोध लावला. गर्द हिरवीगार वनराई आणि मोठा तलाव तसेच व्हा पॉंईटस, कॅथड्रेल पार्क, ऑलिम्पिया रेसकोर्स, राबाग खेडे […]

कोयना अभयारण्य

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात कोयना अभयारण्य आहे. कोयना जलाशयाच्या कडेकडेने कोयना अभयारण्य पसरले आहे. ४२६ किलोमीटर एकूण क्षेत्रफळ असलेल्या या अभयारण्याला सन १९८५ मध्ये अभयारण्याचा दर्जा प्राप्त झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक घनदाट जंगलात कोयना […]

ऐतिहासिक शहर अलिबाग

अलिबाग हे कोकणच्या किनारपट्टीवरील मुंबईपासून अतिशय जवळ असलेले ऐतिहासिक शहर आहे. मुंबईपासून जवळच असल्यामुळे येथे पर्यटकांची सतत रिघ लागलेली असते. सेकंड होम साठी अनेकजण आता अलिबागला पसंती देऊ लागले आहेत. […]

इगतपुरी – एक नयनरम्य हिल स्टेशन

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी हे शहर महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखले जाते. येथे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो.  अनेक छोटे-मोठे धबधबे या ठिकाणी पहायला मिळतात. इगतपुरी शहर मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावर मुंबईपासून सुमारे १३० किमी वर आहे. समुद्र सपाटीपासून या शहराची उंची सुमारे १९०० फूट आहे. ज्याप्रमाणे खंडाळा घाट ओलांडल्यावर खंडाळा लागते त्याचप्रमाणे  कसारा घाट ओलांडल्यावर इगतपुरी शहर लागते.  इगतपुरी आणि खंडाळा साधारणपणे एकाच उंचीवर आहेत. इगतपुरी गावाबाहेर डोंगराच्या पायथ्याशी असलेले विपश्यना केंद्र शहराचे खास आकर्षण आहे. येथे  देशातील निरनिराळ्या भागातून, तसेच परदेशांतूनही अनेक लोक विपश्यनेसाठी येतात. […]

ऑरेज सिटी – नागपूर

नागपूर हे शहर ऑरेंज सिटी म्हणून प्रसिद्ध आहे. नागपूरची संत्री केवळ विदर्भ, राज्य, देशातच नव्हे तर जगात प्रसिध्द आहेत. येथील संत्र्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी आहे. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. दरवर्षी येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होते.

देशातील पहिली सैनिकी शाळा सातारा शहरात

महाराष्ट्रातील सातारा शहरात २३ जून १९६१ रोजी देशातील पहिल्या सैनिकी शाळेची स्थापना करण्यात आली. पहिल्या सैनिकी शाळेमुळे सातारा शहराची देशाच्या कानाकोपर्‍यात ओळख निर्माण झाली. राष्ट्रप्रेम निर्माणासाठी या शाळेचे महत्त्व अबाधित आहे. या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी […]

1 17 18 19 20 21 30