नवीन लेखन...

डाळींब

।। बटवे नम: दाडीमपत्रं समर्पयामि।।

डाळींब हे फळ जितके पौष्टीक तितकेच दिसायला आकर्षक असून त्याची आंबट गोड चव आपल्या सर्वांनाच आवडते.जसे हे फळ रूचकर लागते तसेच ते औषधी गुणांनी परिपूर्ण अाहे म्हणूनच ह्याची पाने पत्रीमध्ये समाविष्ट केली आहेत.

ह्याचे ३-५ मीटर उंचीचे वृक्ष असते.काण्ड त्वचा धुरकट तांबडी असते व गुळगुळीत असते.पाने ५-७ सेंमी लांब व तीन सेंमी रूंद असून दोन्ही टोकास निमुळती असतात.फुले लाल एकल अथवा क्वचित २-४ च्या गुच्छात असतात.फळ गोल,५ सेंमी व्यासाचे व भरपूर कोष युक्त असते.फलत्वचा चिवट असते.

ह्याचे उपयुक्त अंग आहेत फलत्वचा,मुलत्वचा,व फल.ह्याची चव गोड,तुरट,आंबट असून हे अनुष्ण गुणाचे असते तसेच हल्के व स्निग्ध असते.हे शरीरातील तिन्ही दोष शमन करते.

चला आता ह्याचे उपयोग पाहूयात:

१)सालीचा काढा जखम धुवायला तसेच घशाच्या रोगात उपयुक्त आहे.

२)उल्टी मळमळ ह्यात फळाचा रस उपयुक्त आहे.

३)कृमींवर डाळींबाच्या मुळाचा काढा उपयुक्त आहे.

४)जुलाब होत असल्यास सुकवलेली डाळींबाची साल उपयुक्त आहे.

६)डाळिंबाचे फळ हृदयास हितकर असून रक्त वाढवायला मदत करते.

(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४

वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर
About वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर 202 Articles
वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर गेली १० वर्षे गोव्यामध्ये म्हापसा शहरात आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीकच्या माध्यमातून पंचकर्म, आहार मार्गदर्शन, सुवर्णप्राशन असे उपक्रम राबवीत आहेत. लेखनाची आवड असल्याने त्या विविध स्थानिक वृत्तपत्रातून आयुर्वेद व सामाजिक समस्यांशी निगडीत लेखन त्या करतात तसेच आरोग्यसंबंधित विषयांवर शाळा, कॉलेज इ मध्ये व्याख्यान देतात. आहार या विषयात जास्त रूची असल्याने व त्यावर अभ्यास आणि वाचन असल्याने त्यांनी आपला किचन क्लिनीक या सदराद्वारे ऑनलाईन लिखाण सुरु केले आहे. त्या आरोग्य भारती व जायंट्स ग्रूपच्या सदस्य देखील आहेत. आयुर्वेद शास्त्राचा जमेल तेवढा अभ्यास करून त्याचा प्रचार व प्रसार करण्याची त्यांची मनीषा आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..