नवीन लेखन...

बॉलिवूड निर्माता, दिग्दर्शक, लेखक,ओ.पी. रल्हन

ओ पी रल्हन यांनी १९६० ते १९८० मध्ये त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. त्याच्या चित्रपटात अनेक नवीन कलाकारांना स्थान दिले. त्यांनी फूल और पत्थर धर्मेंद्रला त्याच्या पहिल्या चित्रपट स्टार केले. काही लोक देव आनंद ने झीनत अमानला हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटातून आणले असा गैरसमज आहे पण झीनत अमान ओ पी रल्हन यांनी प्रथम त्याच्या हलचल या चित्रपटात काम करावयास दिले. हलचल पासून कबीर बेदी यांनी आपली कारकीर्द सुरू केली. ओ पी रल्हन यांनी अमिताभ बच्चन यांना बंधे हात(१९७३) या चित्रपटात काम करावयास दिले, जेव्हा अमिताभ बच्चन यांची सुरवात होती. ‘फूल और पत्थर’च्या यशानंतर मा.ओ. पी. रल्हन याने मोठी झेप घेताना या ‘तलाश’ चित्रपटाची निर्मिती केली.

प्रमुख भूमिकेत बलराज साहनी, राजेन्द्रकुमार, शर्मिला टागोर व स्वत: ओ. पी. रल्हन. तर चित्रपटाला संगीत सचिन देव बर्मन यांचे. यातील ‘खाई है रे हमने कसम संग रहने की’ आजदेखील तितकेच सुमधुर आहे, १९७१ चा हा चित्रपट आहे. त्याच्या पूर्वप्रसिद्धीची तयारी करताना ‘एक कोटीचा तलाश’ यावर सगळा जोर होता. चित्रपटाच्या प्रसिद्धीत ‘निर्मिती खर्चाचा आकडा’ खेळवण्याचे हे पहिले उदाहरण. त्या काळात काही लाखांत चित्रपट निर्माण होत. (किती पैशात चित्रपट बनतो, त्यापेक्षा कसा बनतो, कोण बनवतो याला खूप महत्त्व असल्याचे ते दिवस होते.)

रल्हनचे एक कोटींवर जोर देण्यामागचे कारण तोच जाणे. जास्त खर्चिक चित्रपट चांगलाच असेल असे प्रेक्षक समजतील (तशा दृष्टीने पाहतील) असा त्याचा समज असावा. एकदा चित्रपट आवडला की ‘तो किती खर्चात बनला’ व ‘तो किती रुपयांत आपण पाहतोय’ याला आपला चित्रपट प्रेक्षक फारसे महत्त्व देत नाही.) ‘तलाश’चे मुख्य चित्रपटगृह अप्सरा होते, तेथेच प्रीमियर झाला. ओ पी रल्हन यांचे १२ जानेवारी १९९७ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..