नवीन लेखन...

मंचकमहात्म्य

मंचकरावांनी डाव्या हाताची पालथी मूठ आपल्या भरघोस मिशांवरून फिरवली . अशी मूठ फिरवली के ते विचारमग्न आहेत असे समजावे . ‘हे मंचकराव ‘कोण ? असा प्रश्न विचारणारा आमच्यागावात नवा असावा किंवा मंचकराव जेथे आहेत ते गावतरी नवीन असावे ! त्यांची आई ते जन्मल्यापासून त्यांना ‘मंचकराव ‘च म्हणत असे , म्हणून ते लहान पणापासूनच ‘राव ‘ झाले . तेव्हात्यांच्या ‘राव ‘ असण्यास ज्ञानाचा , अनुभवाचा , वा वयाचा काही एक संबंध नाही !

सकाळीच नरसूच्या ‘ हाटेलात ‘ चहाची वाट पहात मंचकराव बसले होते . चहा येईपर्यंत ते आपल्या मिशांवरून मूठ फिरवत होते . निरश्या दुधाचा गरमागरम चहाचा अख्खा कप त्यांनी बशीत ओतला , मग कसरत करत बशी तोंडापर्यंत नेली , मिश्या आडून एकदाचा चहा संपवला . पुन्हा एकदा मिश्या मायेने कुरवाळल्या . मिशा कुर्वाळताना त्यांना साक्षात्कार झाला कि आपले लग्नाचे वय झालंय ,आणि आता आपण लग्न करायला पाहिजे !

तिकडे बार्शी कडे सुंदर मुली मिळतात असे त्यांनी ऐकले होते . ते खरेही असावे . कारण मागे गावच्या जत्रेत बार्शीचा तमाशा अल्ता त्यात चिकण्या पोरी त्यांनी पहिल्याच होत्या .

विचार पक्का झाल्यावर त्यांनी तडक विसुभाऊचा वाडा गाठला . लग्न म्हणजे चार पैसे हवेत . अन पैसे सावकार कडे असतात . विसुभाऊ गावचे सावकार .
“इशु ,मला एक लाख रुपय दे !” मंचकरावनी गेल्या गेल्या तडक आपली मागणी नोंदवली . ताकाला जाऊन गाडगं लपवणे हा त्यांचा स्वभाव नव्हताच ! मुळात ताकाला जाताना ते स्वतःच गाडगं नेतच नसत ,ते ताकवाल्यालाच द्यावे लागे !
“कशाला एव्हडे पैशे पायजेत ?”कपाळावर आठ्या पाडत विसूभाऊंनी विचारले .
” कशाला ? हत्ती विकत घ्यायचाय !”
” मायला , दोनपाच एकर जमील ,एक गाढव आहे ते नीट सांभाळणं होईना ! म्हन हत्ती घेतो ! त्या पेक्षा एखादी जुनी ‘लुना ‘ नायतर सायकल घे ! ”
” ईशा , मी तुला फक्त पैशे मागितलेत , सल्ला मागितला नाही !आता त्या पैशाचं काय करायचं ते आमचं अमी बगु ! तुला काय करायच्यात बांड्या पंचायती ? पैशे द्यायचे तर दे , नाहीतर बस त्याच्यावर नागोबा होऊन !”
याला काय उत्तर देणार ?

मंचकरावांनी शेतातल्या गोठ्यातून आपलं लाडकं गाढव काढलं आणि बार्शी कडे निघाले . अर्थात गाढवावर बसून !

यथा अवकाश त्यांना हवीतशी मुलगी मिळाली . तिचे नाव गिरीजा . गिरीजा एक चांगली बायको होऊ शकते याची खात्री पटल्यावर त्यांनी तिच्याशी भगवंताच्या देवळात लग्न केले .

लग्न कार्य उरकल्यावर , गिरिजेला गाढवावर बसवले , आपणही बसला आणि गावाकडचा रस्ता धरला . थोडे अंतर चालल्यावर गाढव मधेच थांबले . बसल्या जागेवरून मंचकरावांनी गाढवाला थोडे ढोसून पहिले . पण छे गाढवाने जागचे हलण्यास नकार दिला ! मंचकराव गाढवावरून खाली उतरले , डाव्या हाताची पालथी मूठ उजव्या मिशीवरून सावकाश फिरवली . किंचित विचारात पडले . मग निर्णय झाला असावा . एक भरीव टीकूर घेतलं ,आणि गाढवाला ,ते चालू लागेपर्यंत , रट्टे दिले !
” हि पहिली वेळ !” मंचकराव म्हणाले . आणि पुन्हा गाढवावर बसले .
चार दोन मैल चालल्यावर गाढव पुन्हा थांबले ! मंचकराव पुन्हा गाढवावरून उतरले , पुन्हा त्या भरीव टिकुऱ्याने , पुन्हा चालूलागे पर्यंत गाढवाला रट्टे दिले .
” हि दुसरी वेळ !” आपल्या भरघोस मिश्यावरून पालथी मूठ फिरवत मंचकराव म्हणाले .

पण गाढवते गाढवच ! चार सहा मैलावर पुन्हा त्याने थांबून असहकार पुकारला ! मंचकराव गाढवावरून खाली उतरले . या वेळेस त्यांनी गिरिजेला पण खाली उतरवले . पिशवीतून पिस्तूल काढले आणि गाढवाच्या डोक्यात गोळी घातली ! गाढव जागच्याजागी गतप्राण झाले . गिरीजा मंचकरावांचा प्रताप पाहून हबकली !
” मूर्ख माणसा ! हे काय केलंस ? अरे हे चांगलं दणकट जनावर होत . आपल्याला शेतीत उपयोगी पडलं असत ! अन तू रागाच्या भरात मारून टाकलास ? तू इतका दुष्ट आणि पाषाणहृदयी आहेस हे मला आधीच माहित असते तर मी तुझ्याशी लग्नच केलं नसत ! ” असे साधारण दहा मिनिटे चालू होते . मंचकराव शांतपणे तिचा आरडा -ओरडा ती दम खायला थांबे पर्यंत ऐकत होते .
” हि पहिली वेळ ! ” आपल्या भरघोस मिश्यावरून पालथी मूठ फिरवत मंचकराव म्हणाले !
मग , मग ,—-

ते दोघे सुखात नांदले ! नेहमी साठी !

ते जसे नांदले तसे तुम्ही पण नांदा !
प्रथमोध्याय ,END-M !

— सु र कुलकर्णी 

आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहतोय . पुन्हा भेटूच . Bye .

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..