नवीन लेखन...

‘साहित्यिक’ ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषा-वैविध्य : विभाग – ९ – अ

साहित्यिक ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषावैविध्य  व त्या अनुषंगानें एकाच रचनाकाराच्या भिन्नभिन्न भाषास्वरूपाची , (आणि अन्य क्षेत्रातील सृजनशील व्यक्तीँची) उदाहरणें यांची ओळख करुन देणारे सदर….


विभाग :

बालसाहित्य :

 –

विभाग

  • कुसुमाग्रज आणि रवीन्द्रनाथ  बालगीतें  :
  • कुसुमाग्रज यांची तारीफ वि. स. खांडेकर, बा. भ. बोरकर इत्यादी श्रेष्ठ साहित्यकांनी केलेली आहे. त्यांना ज्ञानपीठ पारितोषिकही प्राप्त झालेलें आहे. त्याचें श्रेष्ठत्व वादातीत आहे. कुसुमाग्रजांनी काव्य तर लिहिलेंच, पण इंग्लिश नाटकांची भाषांतरें केली, स्वतंत्र नाटकेंही लिहिली. ‘नटसम्राट’ हें ग्रीक ट्रॅजेडीची आठवण आणून देणारे त्यांचें श्रेष्ठ नाटक. काव्याचें म्हणाल तर, त्यांनी नाट्यगीतें लिहिली ; ‘पृथ़्वीचें प्रेमगीत’ यासारखें आगळी प्रेमभावना दाखवणारे आगळें गीत लिहिलें ;   ‘गर्जा जयजयकार क्रांतिचा’ हें स्फूर्तिप्रद गीत लिहिलें, ज्यानें अनेक स्वातंत्र्यसैनिकांना प्रेरणा दिली; ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ यासारखे शिवशाहीतील एका भावनोत्कट पण दु;खद घटनेची आठवण जागवणारे काव्य लिहिलें ; १९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या वेळीं, ‘ बर्फाचे तट पेटुनि उठले, सदन शिवाचें कोसळलें । रक्त आपुल्या प्रिय आईचें शुभ्र हिमावर ओघळलें ।’ अशी राष्ट्रभावना चेतवणारी कविता लिहिली, ‘कांही बोलायाचें आहे, पण बोलणार नाहीं’ हिच्यासारखी ग़ज़लही लिहिली.

त्यांच्या ‘कणा’ या कवितेचा एक अंश पहा –

खिशाकडे हात जाताच हंसत हंसत उठला
“पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेउन, फक्‍त ‘लढ’ म्हणा” !

असे हे कुसुमाग्रज, ‘उठा उठा चिऊताई । सारीकडे उजाडले । डोळे तरी मिटलेले । अजूनही ।‘ असें बालगीतही लिहितात. नंतर त्यांनी बालगीतांचे एक पुस्तकच लिहिलेलें आहे.

  • एक मुद्दा : कवितांमधील व्हरायटी ही एक बाब झाली. पण बालगीतांचा वाचक/ पाठक/ ऑडियन्स् वेगळा असतो, बालकें ती गीतें ऐकतातही आणि एकट्यानें किंवा समूहात गातातही. हा विचार करूनच बालगीतें लिहावी लागतात. कुसुमाग्रजांना बालगीतांचें पुस्तक लिहायची काय गरज होती ? पण, पुढल्या पिढीसाठी त्यानी तें केलें. बालगीतांची गरज वेगळी, नाट्यगीतांची गरज वेगळी, अन्य कवितांची वेगळी. अशा वैविध्यावरून, त्यांच्या प्रतिभेची झेप दिसून येते.

 

 

  • रवीन्द्रनाथ ठाकुर ( टागोर )

रवीन्द्रनाथांबद्दल लिहावें तेवढें कमीच. आधी त्यांनी गीतांजली बंगालीत लिहिली, व नंतर तिचें इंग्रजीत भाषांतर केलें. ते ‘नोबेल प्राइझ’ चे मानकरी होते, यावरून त्यांच्या सहित्यिक प्रतिभेची कल्पना यावी. अनेक उत्तमोत्तम कविता, कथा, कादंबर्‍या त्यांनी लिहिल्या ; ‘रवीन्द्र संगीता’सारखा नवीन जॉनर् (genre) सुरू केला ; ‘जन गण मन..’ हें त्यांचें गीत १९४७ नंतर राष्ट्रगीत बनले. शांतिनिकेतनसारखी आगळ्या वातावरणात शिक्षणाचे पाठ देणारी संस्था त्यांनी सुरूं केली. अशा रवीन्द्रनाथांनी अगदी-लहान मुलांसाठी शिशुगीतांचें पुस्तकही लिहिलें आहे. केवढें हें वैविध्य !

पहा त्यांच्या एका शिशुगीताचा अंश –

ताँतेर बाडी

बाँगेर भाषा

…..

खान खाय गान गाय

नॉय रे नॉय रे नॉय ।

बेडकाबद्दलचें हें शिशुगीत आहे. वेळूतील घर, ‘बांग’ देतात तशी भाषा (आहे त्याची). तो खाणें खातो, व ‘नॉय नॉय नॉय’ असें गाणें गातो. बेडकाच्या ‘आँय आँय’ अशा ओरडण्याला किती सुंदरपणे रवीबाबूंनी ‘नॉय नॉय’ असें दाखवलें आहे !

रवीन्दनाथांना काय गरज होती शिशूंसाठी गीतें लिहिण्यांची ?  पण, पुढल्या पिढीसाठी आपलें दायित्व म्हणूनच त्यांनी तें केलें, आणि त्या काव्यात त्याच्या प्रतिभेचा एक आगळा आविष्कर दिसून आला.

– सुभाष स. नाईक     
Subhash S. Naik

M – 9869002126 .   
eMail : vistainfin@yahoo.co.in

– – –

LATTERATEUR  DNYANESHWAR  AND  LINGUAL-VARIETY –Part – 9 – A

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..