नवीन लेखन...

‘साहित्यिक’ ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषा-वैविध्य : विभाग – ८

साहित्यिक ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषावैविध्य  व त्या अनुषंगानें एकाच रचनाकाराच्या भिन्नभिन्न भाषास्वरूपाची , (आणि अन्य क्षेत्रातील सृजनशील व्यक्तीँची) उदाहरणें यांची ओळख करुन देणारे सदर….


विभाग

  • क्रिएटिव्हिटीच्या संदर्भात, आपण ज़रा आधुनिक काळातील गीतकारग़ज़लकारांकडे वळूं :

शकील, साहिर, मजरूह

कोणाला असें वाटण्यांची शक्यता आहे की, अरे ! ज्ञानदेवांच्या काव्याची चर्चा करतां करतां आपण सिनेगीतकारांकडे कसे आणि कशाला वळलो आहोत ?’  पण, ध्यानीं घ्यावें की, आपण साहित्यिक , तसेंच सृजनशीलतेच्या दृष्टिकोनातून या विषयाकडे पहात आहोत, आणि महत्वाची गोष्ट ही की, हे वरील तिघेही प्रतिथयश व सृजनशील शायर होते, जे केवळ व्यवसाय म्हणून सिनेमाच्या क्षेत्रात आले.

  • शकील बदायुनी. एक गीतकार घेऊं या, शकील बदायुनी. वर आपण शकीलची ग़ज़ल पाहिली, शकीलची कांहीं सिनेगीतेंही पाहिली. वरील दोन्ही गीतें नृत्यांसाठी लिहिलेली आहेत, पण नाच मात्र दोहोंतील  अतिशय भिन्न.

शकीलचें ‘लीडर’मधील हें प्रेमाची महती गाणारें गीत पहा-

एक शहनशाह ने बनवा के हसीं ताजमहल

सारी दुनिया को मुहब्बत की निशानी दी है ।

‘प्यार किया तो डरना क्या ?’ हेंही प्रेमगीत आहे व ‘एक शहनशाह ने’ हेंही. मात्र, दोन्हींमधील फरक पहावा.

याच शकीलनें ‘अपनी आज़ादी को हम हर्गिज़ मिटा सकते नहीं’ यासारखें राष्ट्रभावनेनें भरलेलें गीत लिहिलें ; ‘मन तरपत हरिदरशन को आज’ यासारखें उत्कृष्ट भजन लिहिलें ; ‘नैन लड़ जई हैं तो मनवा माँ कसक भई वै करी’ यासारखें बोलीभाषेतील आणि नृत्याच्या संगतीनें गाण्यासाठीचें गीत लिहिलें ( आणि हें नृत्य ‘प्यार किया तो..’ पेक्षा अशगदीच वेगळें) ; ‘सर जो तेरा चकराए’ सारखी हलकीफुलकी गीतेंही लिहिली. केवढें वैविध्य, आणि कुठेही गुणवत्तेशी compromise, तडजोड नाहीं.

  • साहिर लुधियानवी

साहिरसारख्या शायराबद्दल खरें तर अधिक लिहायची जरूरच नाहीं. तो कॉलेजमध्ये असतांनाच त्याचा ‘तल्ख़ियाँ’ हा उर्दू काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेला होता, व त्याचें नांव झालेलें होतें. नंतर तो (प्रकाश पंडित यांच्या समवेत) दिल्लीला एका उर्दू मासिकाचा संपादक होता. यावरून त्याच्या बुद्धीची झेप ध्यानात यावी. त्याच्या ताजमहालावरील रचनेचा एक अंश पहा –

‘एक शहनशाह ने दौलत का सहारा ले कर

हम ग़रीबों की मुहब्बत का उड़ाया है मज़ाक़ ।

मेरी महबूब, कहीं और मिला कर मुझ से ।’

त्याने आधीच लिहिलेल्या रचनांना सिनेमांमध्ये घेतलें गेलें, जसें की ‘चकले’ , ‘चलो इक बार फिर से अजनबी बन जाएँ हम दोनों‘.

साहिर हा , ‘जला दो इसे फूँक डालो ये दुनिया…. ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है !’ असें भेदक गीत लिहितो ; ‘जो वादा किया वो निभाना पडेगा’ असें ‘रूहानी’ प्रेमाचें गीत लिहितो, ‘बंदे को ख़ुदा करता है इश्क़ … ये इश्क़ इश्क़ है इश्क़ इश्क़’ असे फ़लसफ़ा (philosophy) असलेलें गीत लिहितो ; नृत्यासाठीच रचलेली ‘रेशमी शलवार कुरता जाली का’ व ‘उड़े जब जब ज़ुल्फ़ें तेरी’ अशी गीतें लिहितो ब ‘मैं बंबई का बाबू’ यासारखें हलकेंफुलकें गीतही लिहितो. पहा हें वैविध्य !

  • मजरूह सुलतानपुरी :

हाही मूलत: शायरच. शकीलप्रमाणें यालाही नौशाद यांनी मुशायर्‍यातील शायरी ऐकून सिनेक्षेत्रात आणलें. बेगम अख़्तर यांनी गाइलेल्या ग़ज़लांमध्ये मजरूहच्या ग़ज़लचाही समावेश आहे.

मजरूह हा, ‘जलते हैं जिसके लिये’ असें प्रेमाचें हळुवार गीत लिहितो, ‘लेके पहला पहला प्यार‘ हें प्रेमगीतही लिहितो, तसेंच ‘हम तो मुहब्बत करेगा’ असें प्रेमाचेच धसमुसळें गीतही लिहितो. ‘थाड़े रहियो ओ बाँके यार’ हे, कोठ्यावरील नृत्यासाठी गीत लिहितो, तर कोठेवालीनेंच म्हटलेली ‘रहते थे कभी जिनके दिल में हम जान से भी प्यारों की तरह‘ ही व्यथित ग़ज़ल लिहितो ; तसेंच तो, ‘सी-ए-टी कॅट्, कॅट् मानर बिल्ली’ असें अत्यधिक हलकेंफुलकें गीतही लिहितो. हें वैविध्यच नव्हे काय ?

 

*कोणी असें म्हणूं शकेल की, ‘ते मोठे शायर होतें, मान्य ; पण त्यांनी सिनेगीतें ही, व्यवसाय म्हणून, चित्रपटाची गरज म्हणून, व पैशासाठी लिहिली’. तें एक दृष्टीनें खरेंही आहे. अर्थात्, त्यामुळे त्याच्या बहुरंगी, सृजनशील प्रतिभेला व काव्याला बाधा येत नाहीं.

*तरीही, आपण कांहीं अशा श्रेष्ठांची उदाहरणें पाहूं या, जिथें कुणाला ‘पैशासाठी केलेली रचना’ असें म्हणतां येणार नाहीं.

 

 

– सुभाष स. नाईक     
Subhash S. Naik

M – 9869002126 .   
eMail : vistainfin@yahoo.co.in

– – –

LATTERATEUR  DNYANESHWAR  AND  LINGUAL-VARIETY –Part – 8

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..