नवीन लेखन...

भारत ही मधुमेहाची जागतिक राजधानी आहे. पण का?

India - Why is it the International Capitol on Diabetes?

भारत ही मधुमेहाची जागतिक राजधानी आहे.

मी स्वतः इंग्लंड, अमेरिका आणि सर्व स्कॅन्डीनेव्हियन देशांमध्ये भरपूर प्रवास केला आहे. वास्तविक ह्या देशांमधील खाण्यापिण्याच्या सवयी पहिल्या तर आपल्यापेक्षा जास्त गोड पदार्थ त्यांच्या जेवणात असतात. तरीदेखील भारताला मधुमेहाचा हा शाप का?

ह्याविषयी सर्वात मुख्य लक्षात आलेला मुद्दा म्हणजे रात्रीच्या जेवणाच्या वेळा. ह्या वेस्टर्न कंट्रीजमध्ये, अगदी न्यूयॉर्क सारख्या मोठ्या शहरांमध्ये पण ९०% हॉटेल्स रात्री ९ वाजता बंद होतात. भारतात कोणी रात्री ९ वाजता हॉटेल बंद केलं तर बिचारा हॉटेल मालक नक्कीच उपाशी राहील.

प्रत्येक घरात रात्रीच्या जेवणाची वेळ ही साधारण संध्याकाळी ७ च्या आसपास असते. भारतातील, खासकरून शहरी भागांतील जीवनपद्धतीनुसार ९०% लोकं रात्री १० नंतरच जेवतात.

जेवणानंतर २ तासांच्या वेळेला कफाचा अवस्थापाक काळ म्हणतात. ह्या काळात झोपण्याने कफाचे रोग होण्याची शक्यता कैक पटीने वाढते.

अनुवंशिकता असेलही, पण ह्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

भारतातील काही धर्मांत सूर्यास्तानंतर अन्नपाणी घेत नाहीत. ह्या नियमाचे पालन करणाऱ्यांमध्ये मधुमेहाचे प्रमाण किती टक्के आहे ह्याचा अभ्यास करायला हवा.

 

— डॉ. संतोष जळूकर

Avatar
About डॉ. संतोष जळूकर 33 Articles
डॉ. संतोष जळूकर हे आयुर्वेदिक डॉक्टर असून ते आयुर्वेदिक औषधनिर्मितीच्या व्यवसायात आहेत. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..