नवीन लेखन...

हिंदी पार्श्वगायक कुमार शानू

सुप्रसिद्ध गायक कुमार शानू यांचा जन्म २३ सप्टेंबर १९५७ रोजी झाला.

नव्वदच्या दशकात कुमार शानू ऐन भरात होता. अर्थात, त्याचं स्ट्रगल सुरू झालं ते १९७९ पासून. त्याचे वडील पशुपतीनाथ भट्टाचार्य हे कोलकात्यातील गायक व संगीतकार. त्यांनी कुमार शानूनाम गाण्याचं प्राथमिक शिक्षण दिलं. शानू तबलाही शिकले. स्टेज शो करणाऱ्या शानूला हेरलं ते दिवंगत गझल गायक जगजित सिंग यांनी. त्यांनी आंधिया सिनेमामध्ये त्याला एक गाणं दिलं, शिवाय कल्याणजी-आनंदजी यांच्याशी परिचय करून दिला. कल्याणजी-आनंदजी यांनी त्याला जादूगर या सिनेमासाठी गायची संधी दिली. ते गाणं होतं, म जादूगर है मेरा नाम गोगा..या संगीतकार बंधूंनी त्याला केवळ गाणंच दिलं नाही, तर त्यांचं बारसंही केलं. कुमार शानू यांचे खरे नाव केदारनाथ भट्टाचार्य. किशोरकुमारमधील कुमार हे नाव उचलून त्यांनी त्याला कुमार शानू हे नाव दिलं.

१९९० मध्ये आलेल्या आशिकीमुळे कुमार शानू यांच नशीब फळफळलं. महेश भटच्या या सिनेमातली गाणी खूपच गाजली. कुमार शानू व टी सिरीज वाला गुलशन कुमार यांची ९० ची सहज लोकांच्या ओठावर रुळतील अशी कर्णमधुर गाणी ज्यात सिंहाचा वाटा कुमार शानू यांचा होता. आशिकी मधील गाणी प्रेमाच्या सर्व भाव व्यक्त करणारी सर्व गाणी लोकांनी डोक्यावर घेतली.

नंतर कुमार शानू यांच्या नावावर नवेनवे विक्रम होत गेले. एकाच दिवसात २८ गाणी ध्वनीमुद्रित करणं असो किंवा १९९१ ते १९९५ असे ओळीने पाच फिल्मफेअर पुरस्कार (अब तेरे बिन, मेरा दिलभी कितना पागल है, सोचेंगे तुम्हे प्यार, ये काली काली आँखे आणि एक लडकी को देखा तो) जिंकणं असो, त्याचाच बोलबाला होता.

— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

 पूजा
poojapradhan323@gmail.com
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4227 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..