नवीन लेखन...

सुवर्णमहोत्सव राज्याचा : १ मे, २०१०

Golden Jubilee of Maharashtra State

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त सहा वर्षांपूर्वी, १ मे २०१० रोजी लिहिलेलें हें काव्य आजही कालानुरूपच (रेलिव्हंट) वाटतें.

१.

सुवर्णमहोत्सव हा
सुवर्णाक्षरांनी लिहा
क्रमांक पहिला’ फलक वाहा
असूं देत क्रम नऊ-दहा.
‘महाराष्ट्र हें राज्य महा’
फलद्रूप होईल मंत्र हा
अनंत वाट पहा ।।
२.

नंभर-नंबरी सोनें नच हें , फक्त मुलामा वरचा
घोडा-पहिला, कधीच झाला शर्यतीत शेवटचा
मस्तक उन्नत, समारंभ शत, वाद्यघोष उन्मत्त
इमल्याचा या खचतो पाया, कुणां खबर ना खंत ।।
३.

संदर्भ : उष:काल होतां-होतां काळरात्र झाली
अरे पुन्हां आयुष्याच्या पेटवा मशाली ।
(कवी – सुरेश भट)

उष:काल होणें नच , ना संपणार रात्र
चुडे पेटवाया , आशा नुरे नाममात्र
महाराष्ट्रीं दिवा ना समई, काजवा न तारे
वाट उजेडाची बघतां जीव चालला रे !

४.

कालचा अभिमान उज्ज्वल, आज पण अंधारलें
फोल, तरिही ढोल हा – ‘भवितव्य फारच चांगलें’!
उंचवाया मान अमुची झुंजला राजा शिवा
लढत राजे आज-उद्याचे कापण्यां अमुचे गळे ।।


वाचत भ्रामक प्रगतीपाढा , प्या कटु दुर्गतिकाढा
कळे न तरि – पळतोहे परि गर्तेत चालला गाडा ।।

६ –

राष्ट्राचें-महाराष्ट्राचें नच आतां काहिं खरें
आम्ही बापडे, बांधु झापडें ; आम्हां तेंच बरें ।।

सगळी पानें गळती , तरिही पुनश्च रानें फुलती
जरि हत झाली आशा, तरि जागेल पुन्हां खचितच ती
आज जरी महाराष्ट्र-प्रगतिची खात्री नाहीं आम्हां
तरि ठाउक, अवसेमागुन येतिल पुनवेच्या राती ।।

– सुभाष स. नाईक

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..