नवीन लेखन...

गौरी लंकेश आणि आपण न्यायाधिश

पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुनावरून उभ्या देशात दोन गट पडले आहेत. एक गट खुनाचं समर्थन करतो आहे, तर दुसरा गट तेवढ्याच टोकाचा निषेध. खुन, मग तो कुणाचाही असो, तो निषेधार्हच असतो. कुणाच्याच खुनाचं समर्थन करता येत नाही.

गौरी लंकेश यांच्या खुनाचं समर्थन वा निषेध करणारांना गौरी लंकेश व त्यांच्या विचारांबद्दल किती माहिती आहे, हे कळण्यास काही मार्ग नाही. किंबहूना ती असण्याची शक्यता अगदी कमी आहे. परंतू सोशल मिडीया काय किंवा टिव्हीसारखं इलेक्ट्राॅनिक मिडीया असो, ह्यांची सहज उपलब्धता झाल्याने, जो तो तज्ञ वा न्यायाधिश बनून या खुनावर किंवा कोणत्याही घटनेवर आपापली मतं मांडताना दिसत आहे. मिडिया या विषयावर तर न बोलणंच (खरं तर न पाहाणं) चांगलं. ‘ब्रेकींग न्युज’ला, खरं म्हणजे, चक्क ‘बार्किंग न्युज’ हे नांव जास्त समर्पक आहे असं मला आताशा वाटू लागलंय.

मात्र आपापली मतं मांडताना ती पक्षपाती नाहीत याची काहीच खात्री देता येत नाही. कुणी जर म्हणत असेल, की त्याचं मतं अगदी नि:पक्षपाती आहेत, तर ते खोटं असतं असं खुशाल समजावं. कारण आपण आपली म्हणून जी मतं मांडतो, त्यांवर, आपली स्वत:ची जी पूर्वापार समजूत असते, त्या समजूतींचा प्रभाव आपल्या मतांवर अपरिहार्यपणे पडलेलाच असतो. असं असेल तर ते मत नि:पक्षपाती आहे असं खचितच म्हणता येत नाही. उदा. हिन्दुत्ववादी लोक गौरी लंकेश यांच्या खुनाचं समाज माध्यमांवर छुपं/उघड समर्थन करताना दिसतात तर अ-हिन्दुत्ववादी लोक, गौरी लंकेशांचा जो काही पूर्वेतिहास किंवा त्यांची मतं विसरून खुनाचा निषेध करताना दिसतात. म्हणजे समर्थन किंवा निषेध करताना आपापल्या पूर्वग्रहानुसार आणि आपल्या मतांच्या सोयीने केलं जातं असंच चित्र दिसतं.

‘पेड न्युज’च्या जमान्यात सर्वच पत्रकार तरी समतोल विचार करून आपापल्या पेप्रात बातमी वा लेखाची मांडणी करतात, हे आपण छातीवर हात ठेवून सांगू शकतो का? पत्रकार आणि मिडीयाच्या लोकांची मतंच पेपर/टिव्हीच्या माध्यमातून वाचक/प्रेक्षकांच्यावर लादली जातात, हे आपण रोज अनुभवतो. पत्रकारांनी तरी स्वत:ची मतं बाजूला ठेवून बातमी किंवा माहिती द्यावी अशी अपेक्षा असते. या अपेक्षेला किती पत्रकार खरे उतरतात याचाही विचार प्रत्येकाने करायला हवा. ‘गोबेल्स निती’ सरकारच नव्हे, तर विरोधी पक्ष किंवा अगदी आपणही रोजच्या रोज राबवत नसतो का? आपलीच मतं कशी बरोबर आणि दुसऱ्याची चुकीची हे आपणही प्रंसगोनुरुप वेळोवेळी लोकांना सांगत असतोच की..!

गौरी लंकेश यांच्याविषयी मलाही फारशी माहिती नाही. किंबहूना माझं नियमित पेपर वाचन असूनही हे नांव माझ्या नजरेखालून कधीही गेलं नव्हतं, हे मी पहिल्यांदाच सांगून टाकतो. तरी देखील गेल्या दोन दिवसांत गौरी लंकेशांसंबंधात ज्या काही बातम्या वा माहिती मी समाज माध्यमं किंवा इंटरनेटवरून घेतली, त्यावरून गौरी लंकेश नक्षलवादी चळवळींशी संबंधीत होत्या असा निश्कर्ष काढावा लागतो. गौरी लंकेशांच्या बंधूंची काल एक बाईट इंडीया टिव्हीवर पाहिली. त्यात त्यांनी गौरी लंकेशांचा खुन नक्षलवाद्यांच्या आपापसातल्या भांडणातून झाला असण्याची शक्यता वर्तवली. गेल्या काही वर्षांत प्रत्यक्ष फिल्डवर कार्यरत असणारे नक्षलवादी आणि शहरांत त्यांचे असलेले उच्चभ्रू आणि उच्च शिक्षित समर्थक यांच्यामधली दरी वाढत असल्याच्याही बातम्या मला वाचायला मिळाल्या. गौरी लंकेंशांच्या खुनामागे ही शक्यता आहे का हे ही तपासून पाहायला हवं, ते काम तपास यंत्रणा करतीलच.

दुसरं म्हणजे जेएनयूमध्ये कन्हैयाकुमार प्रकरणात ‘भारत तेरे टुकडे होंगे’ या घोषणा देणारा उमर खालीद आणि स्वत: कन्हैया कुमार यांचं मातृत्व गौरी शंकर यांनी जाहिररित्या स्विकारलं होतं. भारताच्या टुकडे करायची इच्छा असणारांना गौरी लंकेश जाहिररित्या समर्थन देतात, ह्या घटनेचा कुणीच निषेध केल्याचं वा या घटनेवर टिव्हीवर वांझोट्या चर्चा झाल्याचं ऐकिवात किंवा पाहाण्यात नाही. दिवंगत व्यक्तीबद्दल चांगलं बोलावं, वाईट बोलू नये या आपल्या संकेताचा इथेही सोयीनेच वापर केला जातोय असंच म्हणावं लागतंय. ही दोन्ही नांवं साम्यवादी विचारसरणींषी संबंधीत आहेत असं माझं मत आहे. तसंच नक्षलवादी आणि/किंवा साम्यवादी विचारसरणी देशभक्त म्हणून कधीही प्रसिद्ध नव्हती/नाही.

गौरी लंकेश नक्षलवादी किंवा/आणि साम्यवादी चळवळीशी संबंधीत होत्या हे आता स्पष्ट आहे. ह्या दोन्ही विचारसरणी हिन्दुत्ववादी किंवा/आणि राष्ट्रवादी विचारसरणीशी थेट विरोधी विचारसरणी आहेत. म्हणून गौरी लंकेश किंवा तत्सम विचारांच्या व्यक्तींचे होणाऱ्या खुनात, हिन्दुत्ववादी /राष्ट्रवादी विचारांच्या लोकांना थेट आरोपींच्या पिंजऱ्यात उभं करणं कितपत योग्य आहे हे माझ्या लक्षात येत नाही. काॅन्ग्रेस उपाध्यक्ष श्रीमान राहूल गांधींनी तर तसा थेट आरोपच जाहिररित्या केलेला आहे. आपल्याशी न पटणाराच आपला खुन करु शकतो ही शक्यता जास्तीची असली, तरी तोच आपला खुन करतो, हा विचारच मुळात चुकीचा आहे. सकाळ संध्याकाळ आपल्या सोबत असणारांनाच आपलं वाईट करण्याची संधी विरोधकापेक्षा जास्त असते ही शक्यताच आपण कोणी गृहीत धरत नाही. इथं मला जगप्रसिद्ध गुप्तहेर शेरलाॅक होम्सचं एक वाक्य आठवतं. होम्स म्हणतो, “जे होणारच नाही असं आपण समजतो, तेच होण्याची शक्यता जास्तीत जास्त असतं”. गौरी लंकेंशांच्या खुनासंदर्भात विरोधी विचाराच्या लोकांना आरोपीच्या पिजऱ्यात उभं करणारांनी हे ही लक्षात घ्यायला हवं.

गौरी लंकेश असोत किवा केरळात पडत असलेले संघ स्वयंस्वकांचे खुन असोत, त्यांचं समर्थन करताच येणार नाही. पण असे खुन का केले जातात वा पाडले जातात यावर समर्पक आणि समतोल विचार करणं गरजेचं आहे. न्यायाधिशांच्या भुमिकेत शिरण्याची गरज नाही. सामाजिक जगात कर्यरत असलेल्या व्यक्तींच्या खुनांच्यामागे प्रत्येकवेळी राजकारणंच असतं हा विचारही योग्य नाही असं मला वाटतं.

–नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..