येथे दर पाच वर्षांनी सत्तानारायणाची पूजा होते. सत्तानारायण प्रसन्न झाला तर पूजा करणारा नगरसेवक होतो, आमदार होतो, खासदार होतो, पाच वर्षात त्याची भरभराट होते. प्रत्येक वर्षाला त्याच्या एका पिढीची ददात मिटते. पाच वर्षात पाच पिढ्यांची भरभराट होईल इतकी माया जमते. एका बंगल्याचे पाच बंगले होतात, पाच वर्षात पाच पंचतारांकित हॉटेले बांधता येतात, पेट्रोल पंप विकत घेता येतात…. […]
सध्याच्या परिस्थितीत बोलणी शक्य नाही, अशी स्पष्ट भूमिका घेऊन मोदी सरकारने पाकिस्तानसह जगालाही भारताच्या बदलत्या परराष्ट्र धोरणाची चुणूक दाखविली. जागतिक व्यापार संघटनेच्या बैठकीत भारताने अशीच ठोस भूमिका घेतली होती. भारतापासून फारकत घेण्याची उघड इच्छा व्यक्त करणार्या हुरियतच्या नेत्यांशी बोलणी करणे हा पाकचा खोडसाळपणा होता. […]
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २० ऑगस्टला वर्ष पूर्ण होईल. त्यांच्या हत्येचा तपास अजून सुरूच आहे. पोलिसांना अजूनही खुनी सापडलेले ….. […]
आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्कोडा, फार्च्यूनर, इनोवा, सफारी, स्कार्पियो गाडीतून “मागासवर्गीय” उतरतील….! “बघतोस काय रागानं, ओव्हरटेक केलाय वाघानं” ह्या ओळीच्या प्रचंड यशानंतर आता त्या गाड्यांच्या मागे पुढील ओळी दिसतील – १. बघतोस काय रागाने, आरक्षण मिळवलेय वाघाने… २. माज आहे मला मी मागासवर्गीय असल्याचा… ३. सिंहाच्या जबड्यात हात घालून दात मोजणारी मागास जात आमची…!! ४. मी ९६ […]
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचा नुकताच पार पडलेला नेपाळ दौरा भारताच्या संरक्षण आणि आर्थिक हितसंबधांच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. भारताची नेपाळविषयीची असंवेदनशीलता आणि नेपाळचा भारताविषयीचा वाढता संशय यामुळे उभय देशांमधील संबंधात गेल्या काही वर्षांपासून प्रगती दिसत नव्हती. […]
हिवाळ्यापूर्वीच भारतामध्ये घुसखोरी करण्याच्या इराद्याने २,०००-२,५०० अतिरेकी भारतात घुसण्याच्या प्रतीक्षेत असल्याचा गौप्यस्फोट लेफ्टनंट जनरल के.एच सिंग यांनी नाग्रोटा येथे २६ जुलैला केला.पाकमध्ये, ३०-३५ छुप्या अतिरेकी-प्रशिक्षण-केंद्रांतून प्रशिक्षण देणे सुरूच आहे. […]
गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिका व त्यांच्यासह इतर अनेक देश इस्त्राईल पॅलिस्टाईन प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. काही वर्षांपूर्वी पॅलिस्टाईनचे नेते यासर अराफत आणि त्यावेळचे इस्त्राईलचे पंतप्रधान यांना त्यांच्या दरम्यान झालेल्या करारामुळे नोबेल पुरस्कारही देण्यात आलेला होता. प […]
देशातील अंतर्गत सुरक्षा आणखी बळकट करण्यासाठी कोणती वेगळी पावले उचलता येतील, याचा आराखडा तयार करण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी देशातील निमलष्करी दलांचे आणि केंद्रीय सुरक्षा दलांच्या प्रमुखांना केली. गृहमंत्री पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर राजनाथ सिंह यांनी अंतर्गत सुरक्षा सांभाळणार्याा विविध दलांच्या प्रमुखांची बैठक घेतली. […]
सरकारी काम आणि थोडा वेळ थांब. कुठलेही कंत्राट निघाले की प्रत्येक जण मला किती मिळणार याचाच विचार करतो. पण सामान्य लोकांसाठी मात्र कोणीही काहीही करत नाही. भ्रष्टाचार, अप्रामाणिकपणा हा या सरकारी नोकरांच्या रक्तात इतका खोलवर मुरला आहे की त्यांना सामान्यांच्या जीवनाचे मोल जाणवत नाही. राज्यकर्ते ते अगदी शिपायाच्या पातळी पर्यंत सगळेच भ्रष्ट असल्यामुळे हे घडत आहे. कॅमेरे लावण्याचे काम कधी होईल ते कुणीही ठामपणे सांगू शकत नाही. […]