मी शाळेत गेलो त्यांनी माझी जात नोंदवून घेतली मग आम्ही “सारे भारतीय माझे बांधव” ही प्रतिज्ञा रोज रोज म्हटली त्याला पुस्तके ड्रेस मिळाली, मी मला मागितली तर ते म्हणाले “तो गरीब आहे.” “मी पण गरीबच आहे.” “तु गरीब आहेस मान्य पण तुझी जात वेगळी आहे.” दोन गरीबाची पण जात वेगळी असते हे मला त्या दिवशी कळालं. […]
आपण ग्रामपंचायतीच्या निवडणुकात 96 कुळी असतो, आमदारकीला मराठा असतो, आणि दंगलीत कट्टर हिंदू असतो… मग आपण भारतीय कधी असतो..? आपण घरात बौद्ध असतो, गल्लीत महार असतो, गावात मागास असतो, शिक्षणात ‘कॅटेगरी’वाला असतो.. आणि राजकारणात पँथर असतो.. मग आपण भारतीय कधी असतो..? आपण घरात सारस्वत असतो, गावात ब्राह्मण असतो, शहरात हिंदू असतो, आणि धर्मांध दंगलींचा मास्टरमाईंड असतो.. […]
मोर्चे काढायचेच असतील तर , मराठा पुढार्याच्या घरावर काढु या !! कारण गेले 60 वर्षे महाराष्टात बहुसंख्य मुखमंत्री मराठा बहुसंख्य मंत्री मराठा बहुसंख्य आमदार मराठा ( आताही ) बहुसंख्य सहकारी साखर कारखाने , मूठभर मराठयांच्या ताब्यात ! बहुसंख्य खाजगी साखर कारखाने , मुठभर मराठयांच्या ताब्यात ! बहुसंख्य सहकारी बँका , मुठभर मराठयांच्या ताब्यात ! बहुसंख्य नगरपालिका , मुठभर मराठयांच्या […]
“एकदा जरूर वाचा” जाट आंदोलन, हरियाणा: जवळपास ७०० कोटींच शासकीय नुकसान, सरकारचा २०००० करोडचा महसूल बुडाला, शेकडो ने मृत्यू, जवळपास ३ राज्यांत भीषण दंगल. पटेल आंदोलन, गुजरात: २५० कोटींच शासकीय नुकसान, ८००० कोटींचा महसूल बुडाला, १२ मृत्यू, २७ लोकांसोबत २०० पोलीस गंभीररीत्या जखमी, ६५० च्या वर अटक. गुज्जर आंदोलन, राजस्थान: ४०० कोटींच शासकीय नुकसान, ६००० कोटींचा […]
मुख्यमंत्री……. शरद पवार ( मराठा ) अशोक चव्हाण ( मराठा ) पृथ्वीराज चव्हाण ( मराठा ) यशवंतराव चव्हाण ( मराठा ) शंकरराव चव्हाण ( मराठा ) विलासराव देशमुख ( मराठा ) वसंतराव नाईक ( मराठा) सुधाकरराव नाईक ( मराठा ) शिवाजीराव निलंगेकर ( मराठा ) वसंतराव दादा पाटील ( मराठा ) पी.के. सावंत ( मराठा ) […]
ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवात सहाव्या अध्यायात माउलींनी मराठी भाषेची महती सांगताना ” माझ्या मराठाचिया बोलू कौतुके “अशी सुरवात करून ओव्या रचल्या .ज्ञानेश्वरांनी जाणीव पूर्वक मराठीचिया या शब्दा ऐवजी मराठाचिया हा शब्द प्रयोग केला होता . या मधे मराठी बोली बोलणारा तो मराठा हा हेतू असावा .परंतु आज मराठी भाषाच जणू जातीभेदांनी झाकोळून गेली आहे. […]
वेगळा विदर्भ का? हा कायमच चर्चेचा विषय आहे. काही लोकांच्या मनात याबाबत साशंका सुद्धा आहे कि जर वेगळा विदर्भ झाल्यास आपण सक्षम होऊ कि नाही. पण खालील काही बाबींवर कृपया विचार करा आणि सांगा कि फायदा कुणाचा होईल. पण कृपया वाचा एकदा तरी.छत्तीसगड हे राज्य मध्यप्रदेश पासून वेगळे झाले. आता छत्तीसगड चा विकास दर (growth rate) […]
महाडच्या दुर्घटनेचा दोष निसर्गावर टाकून आणि ‘मृतात्म्यां’ची एक ‘सरकारी किम्मत’ ठरवून सरकारी बगळे सावित्रीच्या पुरात मृतांच्या नावाने आंघोळ करून मोकळे झाले. पुलाच्या दुरुस्तीवर पैसे खर्च करण्यापेक्षा जे काही लोक अपघातात मरतात त्यांची अशी ‘किम्मत’ देणं एकदम स्वस्त पडत असावं बहुदा..! शिवाय पुलाच्या दुरूस्तीत यांना असा काय तो मलीदा मिळणार असा विचार त्यांनी केला असणेही सहज शक्य […]
महाराष्ट्रात विदर्भ आणि विदर्भात वऱ्हाड. म्हणजे पूर्वीचे लोक म्हणत सोन्याची कुऱ्हाड. असा आमचा प्रदेश. महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेला बुलडाणा जिल्हा. त्यात खामगाव तालुका. आमच्या जिल्ह्याचे वैशिष्टये म्हणजे, भौगोलिक दृष्ट्या एकसंघ नाही. काही भाग घाटावर तर अर्धा भाग घाटाखाली. त्यामुळे सरळ सरळ जिल्ह्याचे दोन भाग पडलेले आहेत. दुसरे वैशिष्ट्ये म्हणजे, बुलडाणा जिल्हा विदर्भात असला तरी अगदी पश्चिम विदर्भात […]
पवार साहेबांचे आयुष्य चिमटे, कानपिचक्या, धोबीपछाड यातच गेले. मागून आलेले ममता, जयललिता, केजरीवाल, मोदी यांनी एकहाती सत्ता मिळवली पण 55 वर्षे राजकारणात असूनही पवार साहेबांना महाराष्ट्रात स्वबळावर एकहाती सत्ता मिळवता आली नाही. आणि येड्या भक्तांना वाटतं साहेब राजकारणात काहीही घडवू शकतात. 4 वेळा मुख्यमंत्री, 15 वर्षे केन्द्रीय कृषी मंत्री राहूनसुद्धा आज जर जेल भरो करत असाल तर […]