नवीन लेखन...

जुन्या आठवणींना उजाळा देणारे लेखन

पावसाचे संदर्भ…

रिमझिम पाऊस चालू असताना झाडांनी आपले कांद्याचे हात पसरून घ्यायला सुरुवात केलेली.. जिकडे तिकडे ओली ओली माती मधूनच वा-याची गार लहर.. अगदी अंगावर शहारे आणणारी… आसपासच्या नदी नाल्यात खळखळ सुरू झालेली.. भिजलेल्या पाखरांचे फांदी आड दडणे.. वाऱ्याच्या लहरीने झाडांचे शहारणे.. या गोष्टी जितक्या सूक्ष्म निरीक्षणातून येतात तितक्याच त्या सुंदर वाटतात.. […]

चिचा

आमच्या आगरी भाषेत चिंचेला चिच बोलतात. ड ऐवजी र आणि ळ ऐवजी ल तसेच चिंच ऐवजी चिच. चिंचेच्या झाडावर चढला असे कोणाला सांगायचे असेल तर ” तो बघ चिचेच्या झाराव चरला ” असे बोलले जाते. […]

आनंदें भीमदर्शनें !

पुण्यात मारुतीची मंदिरं शंभराहून अधिकच असतील. त्यातील काही तर पेशवेकालीनही आहेत. पुणे तसं गणपतीच्या व मारुतीच्या असंख्य मंदिरामुळे बुद्धिमान व बलशाली आहे. पेठापेठांतून तालमी दिसतात, तालीम आली की, पहेलवानांचं दैवत मारुती मंदिर हे ओघानं येतच. थोडक्यात आढावा घ्यायचाच झाला तर पहा… जिलब्या मारुती, पत्र्या मारुती, पावन मारुती, पोटसुळ्या मारुती, पंचमुखी मारुती, पिंपळेश्वर मारुती, सोन्या मारुती, उंटाडे मारुती, शकुनी मारुती, भिकारदास मारुती, दास मारुती, जुळ्या मारुती, दक्षिणमुखी मारुती, इत्यादी. अनेक ठिकाणी शनी-मारुती मंदिरंही आहेत. […]

करवंदे अलिबागची

शाळेला सुट्टी लागल्यावर ओढ लागायची ती मांडव्याची. समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या मामाच्या गावांत एप्रिल मे महिन्यातील दीड महिन्याची सुट्टी भर्रकन संपून जायची. भाऊच्या धक्क्यावरून लाँच पकडून रेवस मार्गे मांडव्यापर्यंतच्या प्रवासाने सुट्टीला सुरवात व्हायची. […]

काळा फळा…

खेड्यातील शाळांमध्ये स्वातंत्र्यानंतर भिंतीलाच आयताकृती काळा रंग देऊन फळा केला जात असे. काही ठिकाणी तिकाटण्यावर काळा फळा ठेवून गुरूजी शिकवत असत. शहरातील शाळेमध्ये भिंतीवर लाकडी चौकट असलेले फळे असत. पहिली ते चौथीपर्यंत मी फळ्याच्या जवळ जाऊ शकलो नव्हतो. लांबूनच फळा निरखत होतो. […]

‘आपलं’ दुकान..

आपण परदेशात गेल्यावर तिथं कोणी भारतातील, त्यातूनही महाराष्ट्रातील, नशीबाने पुण्यातील माणूस भेटला की, जो आनंद होतो.. त्याचं शब्दांत वर्णन करणंही अवघड आहे. कारण त्यात एकप्रकारचा आपलेपणा, आपुलकी असते. तसंच आपण जिथं राहतो, त्या परिसरात मराठी माणसाचं दुकान दिसलं तर आपण पहिल्यांदा त्याच दुकानात खरेदीला जातो. माझं बालपण तर सदाशिव पेठेतच गेलं. तेव्हा मराठी माणसांची दुकानं भरपूर होती. अगदी भाजीवाल्यापासून ते मिठाईवाल्यापर्यंत! […]

आलिशान प्रवास..

सगळीकडे रिक्षा, टेम्पो, छोटा हत्ती, सुमो, मॅजिक, डीआय, इ. वाहने भराभर पळतांना आपण बघतो. सामान्यांची हीच वाहने असतात. आमच्या लहानपणी मात्र प्रवासासाठी बैलगाडीच होती. आज काही लोक कारने आलीशान प्रवास करतात, तसा आमचा बैलगाडीचा प्रवास ही आलीशान होता. […]

परीस…

भीती नावाच्या प्रकाराची मनुष्याला अगदी लहान वयातच ओळख होत असते.” झोप लवकर, बागुलबुवा येईल बघ. “इथपासून सुरू झालेला आपल्यातील भितीचा प्रवास अगदी शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजेच मृत्यूशय्येवर पडल्यावर होणाऱ्या विलक्षण थररकापापर्यंत सुरूच असतो. भितीची कारणं वेगवेगळी असतील… प्रतिक्रिया सुद्धा वेगवेगळ्या असतील परंतु कोणतीही व्यक्ती घ्या कशाची ना कशाची भिती तिला सदैव सतावत असतेच.. लहानपणी मला अशीच बुरुजावरच्या […]

वसुधैव कुटुम्बकम

कुटुंब हे घरातील सदस्यांनी मिळून तयार होते. आई-वडील, काका-काकू, भाऊ, बहीण आणि आजी-आजोबा. म्हणजे एकत्र कुटुंब! आई-वडील आणि मुलगा-मुलगी हे झालं छोटं कुटुंब! आपल्याबरोबरच पशु-पक्ष्यांना देखील कुटुंबात सहभागी करुन घेतले तर त्याला आपण नक्कीच ‘वसुधैव कुटुम्बकम’ म्हणू शकू, यात काहीएक शंका नाही… […]

शाळा हेच आमचे समाज माध्यम..

तेंव्हा शिक्षकाजवळ छडी असायचीच आज जसं मोबाईल असतो तशी.. त्या छडीमुळेच तर व्हायरल व्हायचे आमचे पराक्रम.. त्या छडीचीच फ्रेन्ड रिक्वेस्ट यायची आमच्या पाठीवर.. मग काय.. त्यात वेगवेगळे राग, आलाप, ताना घेऊन सुरु व्हायचे संगीत.. थोडी धूसफूस.. हे आमचं फेसबुक.. बुकात फेस लपवून फुंदत-फुंदत रहायचं कितीतरी वेळ.. थोड्या वेळात सारं विसरलं जायचं… आजही हे आठवलं की हसू आवरता येत नाही. सगळं आमच्या सोशल मिडिया मध्ये लोकप्रिय होतं.. कारण शाळा हेच आमचं समाज माध्यम होतं.. प्रभावी !!! […]

1 4 5 6 7 8 16
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..