अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये जोसेफ तुस्कानो यांनी लिहिलेला हा लेख जगणे सरळधोपट असले की त्यात बेचवपणा येतो. कुतूहल, धाडस, उत्कटता, ईर्षा यातून बरेवाईट निर्णय घेऊन आपण जगतो. ठेचकळत, अडखळत अपयशावर मात करत यश संपादन करतो त्याची चव काही औरच असते. आयुष्यातील विविध टप्प्यात उत्कृष्ठतेचा ध्यास अवश्य मनी असावा, पण तिच्या प्राप्तीचा हट्ट नसावा. ‘देवाची […]
श्रावण महिना म्हणजे जिकडे तिकडे हिरवागार परिसर ओढे नदी नाले पाऊस भरपूर असल्यामुळे खळखळ वाहत असतात. तर काही वेळा महापूर येण्याची सुद्धा शक्यता असते या महिन्यांमध्ये सर्वत्र आनंदी आनंदतरळत असतो. या नागपंचमीला लग्न झालेल्या नवक्या मुली माहेरहून सासरला येतात घरात मुली आल्या म्हणजे घर गजबजून जाते. या महिन्यामध्ये पोषक वातावरण पावसाची रिमझिम तर सारखी चालू असते. पाऊस चालू झाला म्हणजे पावसाच्या रिमझिम मध्ये लहान मुले मुली घराच्या बाहेर पटांगणामध्ये आनंदाने गाणे म्हणतात….। […]
डॉ सागर देशपांडे यांनी संपादित केलेल्या “शतक पाहिलेला माणूस ” या पुस्तकाच्या प्रकाशनाचे त्यांनी मला निमंत्रण पाठविले. अविनाश धर्माधिकारी, देगलूरकर सर, पी डी पाटील, भूषण गोखले सर, प्रदीप रावत आणि बाबासाहेबांचे चिरंजीव (अमृत पुरंदरे) ही बिनीची नावं समारंभाकडे खेचून नेण्यास समर्थ होती. […]
ऑक्टोबर २००७ मध्ये माझी एक मोठी इच्छा अचानक पूर्ण झाली. निर्मात्या मेधा मेहेंदळे यांच्या तन्वी प्रॉडक्शनच्या ‘डॉटर’ या हिंदी चित्रपटासाठी मी एक गाणे रेकॉर्ड केले. संगीतकार सलील अमृते होते. माझी पत्रकार विद्यार्थिनी तृप्ती दोंदेच्या मार्फत प्रेरणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण कुलकर्णी मला भेटले. लोकसत्ता आणि दिशा डायरेक्टरसाठी कार्तिकी एकादशीनिमित्त ‘मुखी नाम हाती टाळ’ हा अभंगाचा कार्यक्रम ते […]
चैत्र महिना उजाडतो. आकाश निळ्या रंगाने झळकू लागते. आसमंतात सोनशिंपण पसरते. सूर्यकिरणांचे नाजूक हात पर्वतशिखरे गोंजारू लागतात. बर्फाची चादर हलकेच दूर होऊ लागते. नव्या नवलाईचे दिवस सुरू होतात. खुलणारा निसर्ग हसरा होऊ लागतो. […]
आळशीपणा, दुर्गुण आणि दारू पिण्याची सवय ह्यांचा व्हायचा तोच परिणाम होऊन त्या आईचा थंडगार मृत देह तिच्या दुर्दैवी मुलांच्या मधोमध पडला होता. ती दारूच्या नशेत स्वतःच्या घराच्या दारात येऊन पडली व भेदरलेल्या तिच्या मुलांच्या समोरच तिचा देह निष्प्राण झाला. एऱ्हवी त्या बाईवर रागाने डाफरणारा प्रत्येक गांवकरी आता हळहळत होता. मृत्यू माणसाच्या कोमल भावनांना आवाहन करतो. तिच्या […]
21व्या शतकात ठाणे शहराने आपले हात-पाय पसरवले. कधी काळी जंगलातून जाणारा घोडबंदर रोड आता भरवस्तीत आला आहे. या वाढत्या ठाण्यातील रसिकांच्या कलातृप्तीसाठी निर्माण झालं डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह! या सगळ्या बदललेल्या परिस्थितीत वाढलेल्या ठाण्यासाठी एक नवे सांस्कृतिक केंद्र निर्माण होणं अपरिहार्य होतं. या अपरिहार्यतेमधून 6 डिसेंबर 2012 रोजी ‘ठाणे आर्ट गिल्ड’ अर्थात TAG या संस्थेची स्थापना झाली. कलेच्या माध्यमातून कलेचा प्रसार हेच ध्येय समोर ठेवून टॅगचा जन्म झाला. अर्थात ‘ठाणे आर्ट गिल्ड’ ही संस्था केवळ कलावंतांची नसून, सर्व रसिकांसाठी आहे. […]
यशवंतराव विद्यापीठ गंगापूर नाशिकचे उपकुलगुरू डॉ. पंडित पालांडे माझ्या गाण्याचे चाहते होते. या विद्यापीठाच्या १८व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी माझा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात माझी विद्यार्थिनी दर्शना घळसासी माझ्याबरोबर गायली. वादक कलाकार म्हणून कीबोर्डवर माझाच विद्यार्थी सागर टेमघरे तर तबलावादक म्हणून अमेय ठाकुरदेसाई आमच्याबरोबर होता. सागर आणि अमेय आता अनेक व्यावसायिक कार्यक्रमांनाही वादन साथ करू लागले […]
१८५६ पर्यत ब्रिटिशांचे एकछत्री साम्राज्य संपूर्ण भारतात स्थापित झाले होते. १८५७ चा ऐतिहासिक लढ्याने जनजगृती तर केली पण त्याला यश आले नाही. पुढे १८८५ पर्यंत राष्ट्रीय भावना वाढीस आली होती. लोकांमध्ये देशप्रेम, पारतंत्र्याची चीड, स्वराज्य हे सगळे विचार वाढतांना दिसून आले. सुरवातीला अर्ज-आर्जव करून अधिकार पदरात पाडून घ्यावे असे वाटत होते आणि तसेच काम पण सुरू होते,मात्र पुढे-पुढे ह्यातून निष्पन्न निघत नाही म्हटल्यावर मात्र जहाल विचार प्रबळ होऊ लागले. ह्या सगळ्या साठी संघटन महत्वाचे, एकी महत्वाची त्यासाठी काय काय करू शकतो, तर महाराष्ट्रातल्या पुण्याच्या डॉ इंदुमती नाईक ह्यांनी चक्क घरातच बांगड्यांचे दुकान काढले, घरा-घरातून स्वातंत्र्य चळवळ पोचविण्यासाठी. […]
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये डॉ. प्रदिप कर्णिक यांनी लिहिलेला हा लेख तुमच्या आयुष्यात राहून गेलेल्या, ज्या तुम्हाला करायच्या होत्या, पण होऊ शकल्या नाहीत, अशा विषयावर आमच्या दिवाळी अंकासाठी एक लेख लिहून द्यावा, असा श्री. नालेसाहेबांचा फोन आला. ते विषयाचा अधिक विस्तार करीत होते आणि मी त्याचवेळेला विषयाला मनात प्रारंभही केला. म्हटले, अरे वा, अगदीच […]