भरपूर जेवल्याने भरपूर ताकद येते हा जसा गैरसमज आहे, तसा कमी जेवल्याने ताकद कमी होते, हा पण गैरसमजच आहे. विशिष्ट वयात विशिष्ट आजार होणं, हे सर्वसामान्य आहे पण, तरूणांचे अकाली आजार आणि अकाली मृत्यु चटका लावून जातात. वृद्धत्व आणि मृत्यु लवकर येऊ नये असे प्रत्येकाला वाटते. हे चुक नाहीच. वृद्धत्व सुद्धा अनुभवले पाहीजे. जसजसे वय वाढत […]
आपण आजारी कधी पडतो ? ….काही तरी चुकलं तर. ! काहीवेळा याचे कारण तात्कालिक असते, तर काही वेळा काही कारणांचा आधीपासून साठा /संचय झालेला असतो, कधीतरी ते निमित्त मिळून ऊफाळून वर येते, एवढेच ! म्हणून ही कारण शोधून काढली की झालं. त्यातील एक कारण.. परान्न ! परान्न म्हणजे आपल्या समक्ष न बनवलेले अन्न. ते बनवताना नेमके […]
आरोग्यटीप बर्याच जणाकडे फिरते आहे, माझ्या एका **कडे तर सात आठ गटातून येते, तीपण बाकीच्यांना पुढे पाठवते. पण स्वतः न वाचताच ! कृपया असे होऊ नये. पुढे पाठवावीशी वाटली तर स्वतः वाचून नंतरच पुढे पाठवावी. नाहीतर इकडून तिकडून गेले वारे… ज्यांच्याकडे पाचसहा जणांकडून दररोज आरोग्यटीप येऊनही वाचली गेली नाही, अश्या महाभागांसाठी, “त्या महत्वाच्या सूत्रातील” सर्व मुद्यांचा […]
काळ म्हणजे ऋतु. वेळ ! ठराविक आजार ठराविक ऋतुमधेच होतात, अमावस्या पौर्णिमेला काही रोगाची जसे, दमा, त्वचाविकार, मानसरोग इ.ची काही लक्षणे वाढतात. याला औषध काय ? काळ हे सर्व प्रश्नांना रामबाण औषध आहे. असे म्हटले जाते. ठराविक गोष्ट घडण्यासाठी काही काळ जाणं आवश्यक असते. बापाची चप्पल मुलाच्या पायात व्हायला सोळा वर्ष जावी लागतात. थोडं विषयांतर होईल […]
आहाराचा विचार कोणत्या कोणत्या गोष्टींवर अवलंबून असतो हे आपण पहात होतो. या सूत्रातील पुढचा महत्वाचा मुद्दा आहे, सात्म्यता. म्हणजे बाकी दुनिया गयी भाड मे, मला काय पचणारे आणि माझ्यासाठी अमुक पदार्थ चालण्णार आहे की नाही. हे ठरवणे. एखाद्याला पंधरा दिवस सलग पुरणपोळ्या खाल्या तरी पचतात, एखाद्याला पन्नास जिलब्या पण पचतात. पण तोच नियम सर्वांना लागू होईल […]
छान पंगत बसलेली आहे. जिलब्यांचा मस्त वास दरवळतो आहे. आवडीची मंडळी वाढायला अवतीभवती बागडताहेत, अशा वेळी जिलबी खाण्यावरून पैज लागते. “अरे काय तू, आवरलंस एवढ्यात ? तू आणखी एक जिलबी खा, मी दोन जिलब्या जास्त खाईन…बघू कोण जास्त जिलब्या खाते ते ..” “मान्य मला. बघ हा, मागे यायचं नाही, ” झालं पैज लागली. एकच गलका झाला. […]
सूत्रातील पुढील महत्वाचा मुद्दा आहे, प्रकृतीचा ! . आहाराचा आणि प्रकृतीचा खूप जवळचा संबंध असतो. वाताची प्रकृती असेल तर आहार पण वातासारखा. सारखाच अनिश्चित. वारा आला तर भडकून पेटेल. नाही आला तर नुसता धूर. अगदी तस्सेच. अश्या वात प्रकृती वाल्यांनी आहारावर, आपल्या जीभेवर लक्ष आणि संयम ठेवला पाहिजे. जो पदार्थ काल खाल्ला तो पचला, पण आज […]
सूत्रातील आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे “भूक ” जशी पोट भरल्याची जाणीव आहे, तशी ही जाणीव पण प्रत्येकालाच असते. आयुर्वेदात याला तेरा वेगांपैकी एक वेग, असं संबोधले आहे. समजून घेण्याच्या दृष्टीने भूक म्हणजे चुलीतला विस्तव. हा पुनः वय, देश, काल यानुसार कमी जास्त होतो. आवडीचा पदार्थ असला तर भूक जास्तच लागते. आवडीचा पदार्थ नसला तर असलेली […]
आहार आणि वय, आहार आणि देश, तसच आहाराचा शरीरबलाशी मनोबलाशी संबंध असतो. बल म्हणजे ताकद, क्षमता. ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. सर्वसाधारण तरूण वयाची पोटात अन्न सामावून घेण्याची क्षमता जास्तीत जास्त 350 ते 400 ग्रॅम असते. आग्रहाने जरी जेवले तरी यापेक्षा जास्त अन्न पोटात राहू शकत नाही. जर जबरदस्तीने ठूस ठूस के भरण्याचा प्रयत्न केला तर उलटी होईल, […]