नवीन लेखन...

आपल्या रोजच्या आहारासंदर्भात अतिशय मौल्यवान माहिती या सदरात दिली जात आहे.

याला जीवन ऐसे नाव भाग १३

  न पिबेत् पंक शैवालतृणपर्णाविलास्तृतम् । सूर्येन्दुपवनादृष्टमभिवृष्टं घनं गुरू ।। फेनिलं जन्तुमत्तप्तं दन्तग्राह्यतिशैत्यतः । वाग्भट सूत्रस्थान 5-5/6 “चिखल, शेवाळ, गवत, व पाने यांनी व्याप्त व गढुळ झालेले, ऊन, चांदणे, व वायु यांचा जेथे कधीही प्रवेश झाला नाही अश्या ठिकाणचे, पावसाचे पाणी, नुकतेच मिळाल्यामुळे राड झालेले, जड, फेस आलेले, कृमीयुक्त, तापलेले, व दातास कळा उत्पन्न करण्यासारखे गार […]

याला जीवन ऐसे नाव भाग १२

  वाग्भटाचार्य म्हणतात, भोजनापूर्वी पाणी पिल्याने, (भूक मेल्याने, जेवण कमी जाते. परिणामी ) शरीर बारीक होते. जेवणानंतर पाणी पिल्याने जाडी वाढते. जेवण झाल्यामुळे अग्नि मंद झालेला असतो. पोटात आलेले अन्न, घुसळण्याचे काम सुरू होऊन, पचनाचे काम सुरू झालेले असते. अशा वेळी पाणी पिल्याने, उकळी आलेल्या तयार चहात थंडगार पाणी ओतून सर्व चहा परत गार अवस्थेत नेल्यासारखे […]

याला जीवन ऐसे नाव भाग ११

पदार्थामधील पाणी कमी केले की तो टिकाऊ होतो. द्राक्ष आणि मनुका बेदाणे, ओला अंजीर सुका अंजीर, ताजी फळे आणि सर्व ड्राय फ्रूटस, यात टिकाऊ काय ? कोणते पदार्थ ? जे सुके आहेत ते. ज्यांच्यात पाणी कमी आहेत ते ! साधा रवा आणि भाजून ठेवलेला रवा. साध्या रव्यात कीड पटकन होते. पण भाजून ठेवल्याने त्यातील पाणी कमी […]

याला जीवन ऐसे नाव भाग १०

  ज्या पदार्थात पाणी जास्त तो टाकावू. आणि ज्या पदार्थात पाणी कमी तो टिकाऊ असे लक्षात येते. चार पदार्थ घरात बनवले आहेत. आमटी भात चपाती आणि भाकरी. हे पदार्थ व्यवस्थित झाकून ठेवले आहेत. सर्वात पहिला फुकट जाणारा पदार्थ आहे आमटी. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत आमटीला आंबूस वास येऊ लागतो. दुसऱ्या दिवशी रात्री भात फुकट जातो. तिसऱ्या दिवशी […]

याला जीवन ऐसे नाव भाग ९

तहान तर लागली आहे आणि अनावश्यक पाणी प्यायचे पण नाहीये, अशा वेळी काय करावे? साधे उदाहरण घेऊ. दुपारच्या वेळी भर उन्हात बाजारात गेलाय, आजच्या भाषेत शाॅपिंगला ! प्रचंड तहान लागली आहे. आणि तुम्हाला थंडगार पाणी ऑफर केले, तर एक ग्लास थंडगार पाणी अगदी एका दमात पिऊ शकाल. पण तहान भागली, असं वाटणार नाही. पाणी साधे असेल […]

याला जीवन ऐसे नाव भाग ८

संदर्भ – वाग्भट तृष्णा चिकित्सा अध्याय तहान हा जेव्हा रोग होतो, तेव्हा हा रोग कमी होण्यासाठी औषधे घ्यावी लागतात. ही तहान पण तीन प्रकारची लागते. वाताची, पित्ताची, आणि कफाची. त्यातील सूक्ष्म फरक वैद्यांच्या लक्षात येतो. यासाठी वैद्यांच्या अनुभवाचा आणि ग्रंथोक्त ज्ञानाचा फायदा घ्यावा. पण सर्वसाधारणपणे पाणी पिऊनदेखील जर तहान शमली नाही तर काय करावे, ते उपाय […]

याला जीवन ऐसे नाव भाग 7

1अपानवायु आणि ढेकर, 2मल, 3मूत्र, 4शिंक, 5तहान, 6भूक, 7खोकला, 8जांभई, 9उलटी, 10अश्रू, 11शुक्र, 12झोप आणि 13श्रमामुळे लागणारा दम, यांना वेग असे म्हटलेले आहे. यातील कोणाचेही अवरोध करू नये, किंवा मुद्दाम प्रवर्तन करू नये.म्हणजे निर्माण करू नये. या प्रत्येक रोगाचा अवरोध केल्यामुळे काय काय लक्षणे दिसतात, ते वाग्भट या शास्त्रकारांनी अध्याय चार मध्ये वर्णन केले आहे. या […]

याला जीवन ऐसे नाव भाग ६

वेगान् न धारयेत न प्रवृत्तयेत वेगांचे धारण करू नये अगर मुद्दाम प्रवर्तन करू नये. म्हणजे शास्त्रकार असे सांगतात की, शरीराकडून आतून जे सांगितले जाईल तेवढे त्या वेळी करावेच. आणि जर केले नाही तर त्रास होणार हे शंभर टक्के सत्य आहे. तहान, भूक, उलटी, संडास, लघवी इ. असे एकुण तेरा वेग आहेत, ज्यामधे त्याला विसरून चालत नाही. […]

याला जीवन ऐसे नाव भाग ५

गंगोत्री,यमनोत्री हरिद्वारचे पाणी वेगळे, नाशिक सातारा पुण्याचे वेगळे, बार्शी सोलापूर यवतमाळचे वेगळे आणि कोकणाले वेगळे! म्हणजे पचायला कमी जास्त वेळ घेणारे ! केमिकली एचटुओ. पण फिजिकली त्यात एच आणि ओ बरोबर आणखी कितीतरी रसायने पिण्याच्या पाण्यात देखील आढळतात. कोकणातले पाणी तर सर्वात प्रदूषित. वरून येणारी सर्व केमिकल, शिवाय समुद्रातून भरतीच्या वेळी नदीमधे मागे फिरणारे पाणी जमिनीमध्ये […]

याला जीवन ऐसे नाव भाग ४

आपले शरीर सत्तर टक्के पाण्याने भरलेले आहे. बाहेरील उष्णतेमुळे अंगातील पाण्याची पण वाफ होत असते. घाम येत असतो. पाणी कमी होत असते. पाणी कमी झाले तर नाजूक अवयवांना त्रास होतो, म्हणून पाणी भरपूर प्यावे असे आजकाल डाॅक्टरमंडळींकडून सांगितले जाते. बरोबर आहे, काही चूक नाही. पाण्याला जीवनच म्हटले आहे. पण अति तिथे माती हे पण विसरून चालणार […]

1 24 25 26 27 28 39
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..