नवीन लेखन...

ब्रिगेडिअर हेमंत महाजन (निवृत्त) यांचे हे सदर अत्यंत लोकप्रिय आहे.

पाकिस्तानचे ‘सर्जिकल ऑपरेशन’ सुरूच ठेवायला हवे

‘सर्जिकल स्ट्राईक’चे गांभीर्य कळायला उरी येथील लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य कळायला हवे. 18 सैनिकांचा जीव घेणारा हल्ला झाल्याने संपूर्ण भारतात संतापाची लाट पसरली.तेव्हा लष्कराच्या मानसन्मानाला ठेच लागली. त्यामुळे लष्कराचे मनोधैर्य ढासळण्याची शक्यता असते. अशा वेळी हल्ल्याचा निषेध केवळ शब्दांनी करून भागत नाही, तर दहशतवाद्यांना अद्दल घडेल अशा प्रकारे कृतीतून उत्तर द्यावे लागते. तेच लष्कराने […]

चीनला जरब बसण्याकरता अमेरिका भारत सहकार्य ही काळाची गरज

मागच्या वर्षी अलिप्ततावादी देशांची परिषद व्हेनझुएलानं पुढं ढकलली ती पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी. ते त्यावेळी ताजिकिस्तान, कझाकिस्तान आदी देशांच्या दौऱ्यावर जाणार होते. आता यंदाही या परिषदेला पंतप्रधान जाणार नाहीत. यातून संदेश स्पष्ट आहे. आता अलिप्ततावादाचं नेतृत्व करण्यापेक्षा अमेरिकेशी सामरिक व्यवहारवाद अधिक मोलाचा वाटतो. अमेरिका आणि भारताच्या शिष्टमंडळामध्ये एकाच वेळी दिल्ली आणि वॉशिंग्टनमध्ये दोन वेगवेगळ्या विषयांवर वाटाघाटी होऊन […]

वीर जवान आणि सामान्य नागरिक यांच्यात मैत्रीचा पूल

लक्ष्य फाउंडेशन’तर्फे अनुराधा प्रभुदेसाई यांचा वीर जवान आणि सामान्य नागरिक यांच्यात एक मैत्रीचा पूल बांधण्याचे काम तेथे कर माझे जुळती… १९९९ मध्ये भारताला पाकिस्तान या शेजारी राष्ट्राबरोबर युद्धाला सामोरे जावे लागले. हिमालयाच्या १८००० फूट उंचीच्या शिखरावर- भारत- पाक सीमेवर- कारगिल येथे, हाडं गोठविणार्या थंडीत आमच्या जवानांनी शर्थीने युद्ध केले आणि भारताचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आपले प्राण […]

स्कॉर्पिन पाणबुडीची माहिती लिक होणे धोकादायक

बांधणी प्रक्रियेत पाणबुडय़ांमध्ये बदल करणे जरुरी भारतीय नौदलाची सामरिक क्षमता वाढवणा-या अत्याधुनिक स्कॉर्पिन पाणबुडीच्या क्षमतेचा गोपनीय माहितीचा २२ हजार पानांचा दस्तऐवज फुटल्याने देश हादरून गेला आहे.फ्रेंच कंपनी डीसीएनएसच्या सहाय्याने मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये या पाणुबडय़ांची उभारणी सुरू असून त्याचा तपशील ‘द ऑस्ट्रेलियन’ या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी याची गंभीर दखल घेत भारतीय नौदलाला या […]

पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट, बाल्टिस्तान भारताचा अविभाज्य भाग

राज्यसभेत काश्मीरमधील चर्चेला उत्तर देताना, त्यानंतर लगेच स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलुचीस्थान, गिलगिट आणि बाल्टिस्तान या प्रांतांमध्ये पाकिस्तानने करत असलेल्या अत्याचाराविषयी भाष्य केले. ते म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीर ज्यामध्ये गिलगिट आणि बाल्टिस्तान सामील आहे, हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि आम्ही तो नक्कीच यापुढे मिळवणारच. याशिवाय त्यांनी बलुचिस्तानमध्ये सुरू असलेल्या स्वातंत्र्य लढ्याचाही उल्लेख […]

चिनी ड्रॅगनचे आव्हान आणि त्याला भारताचे प्रत्युत्तर

गेल्या १५ दिवसात भारत चीन संबंधांवर परिणाम करणार्‍या अनेक घटना घडल्या. त्याचे विश्लेशण करुन पाउले उचलणे महत्वाचे आहे. या घट्ना होत्या,  दक्षिण चीन समुद्राचा मालकी हक्क मिळवण्यासाठी चीनने मागितली भारताची मदत, पाकला चीनने दिलेल्या अणुभट्ट्या,उत्तराखंडमधील चीनी घुसखोरी,प्रचंड यांच्या रूपाने भारताला नेपाळत मिळालेली संधी .आपले  राष्ट्रिय हित जपण्यासाठी आपण योग्य उपाय योजना करायला पाहिजे. वेगवेगळी नावं धारण करून देशातील संवेदनशील […]

मेजर गोपाळ मित्रा आणि मिनी : दोघांचं अलौकिक आणि प्रेरणा देणारं प्रेम

उत्तर भारत आणि जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी आणि दहशतवादावर नियंत्रण ठेवण्यासाठी लष्कर मोठय़ा प्रमाणावर प्रयत्नशील आहे. यामध्ये दरवर्षी किमान ७००-८०० जवान आणि २५ ते ३० अधिकारी शहीद होतात. १९८८ पासून असलेली ही परिस्थिती कायम आहे. ही घुसखोरी थांबवताना सुमारे तीन हजार जवान दरवर्षी मोठय़ा प्रमाणावर जखमीही होतात. अनेक जवान आपले हात-पाय, डोळे गमावून बसतात. असं अपंगावस्थेत जिणं किती […]

स्मृती कारगिल युद्धाच्या

२६ जुलै रोजी कारगिल युद्धाला १७ वर्षे पूर्ण झाली. अजूनही या युद्धाची वीरगाथा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये तितकीच जिवंत आहे. कारगिल युद्धाचा प्रसार वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर फार मोठ्या प्रमाणात करण्यात आला. या युद्धावर अनेक पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत. कारगिल, लेह हा भाग समुद्रसपाटीपासून १३ हजार ते १८ हजार फुट उंचीवर आहे. तिथे वर्षांतून सहा महिने बर्फ […]

मणिपूर – हिंसाचाराने सर्वात ग्रस्त ईशान्येकडील राज्य

अफस्पा काढण्याआधी लष्कर मागे घेणे जरुरी अस्थिर भागात लष्कराने अतिबळाचा वापर करू नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असून, यावर निव्रुत्त लष्करी अधिकाऱ्यांनी प्रतिकुल प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मणिपूरमध्ये मागील 20 वर्षांत अनेक  बनावट चकमकीची प्रकरणे घडली असून, त्यांचा तपास होणे गरजेचे आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले. संरक्षण व पोलिस दलांनी अतिबळाचा वापर लष्करी विशेषाधिकार […]

1 13 14 15 16 17 28
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..