नवीन लेखन...

हिमोग्लोबिन वाढणारे बहुतेक पदार्थ उष्ण

हिमोग्लोबिन वाढणारे बहुतेक पदार्थ उष्ण आहेत. त्यामुळे खजूर खायचा असेल तर तो तुपासह खायला हवा. बीट, पालक, मेथी याने लोह वाढते. पण शरीराने ते स्वीकारायला हवे. लोह व हिमोग्लोबिन यांचे सात्म्य करणे तेवढेसे सोपे नाही. सततच्या धावपळीमुळे शरीर जर गरम असेल तर अन्नातील हिमोग्लोबिन कमी ओढून घेते. म्हणून शरीरातील, विशेषतः मेंदूतील उष्णता अजिबात वाढता कामा नये. आपण अलीकडे तेलकट, मसाल्याचे तिखट पदार्थही भरपूर खातो, त्यानेही पोटातील उष्णता वाढते. प्रत्येक वस्तूला आपण फोडणी देतो, पोह्यांवर लिंबू पिळतो हे त्यातील धातूंचे शरीरात शोषण व्हावे म्हणून; पण आपण लिंबू पिळण्याऐवजी पोह्यावर दही घालून खातो. त्यामुळे त्याचा शरीराला काही फायदाच मिळत नाही; नुकसान मात्र होऊ शकते. म्हणून शरीरातील उष्णता न वाढवता हिमोग्लोबिन वाढवणारे शांतीरोझसारखे औषध आहारात रोज ठेवावे. पाळी नियमित राहावी यासाठी वैद्यांचे मार्गदर्शन घ्यावे. शतावरी कल्प, च्यवनप्राशही आहारात असू द्यावे. केवळ आहाराने हिमोग्लोबिन वाढत नाही.

Avatar
About आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप 116 Articles
आरोग्यदूत हा वैद्य सुविनय दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक बहुमोल माहितीची देवाणघेवाण करणारा एक अतिशय लोकप्रिय व्हॉटसअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवरील निवडक पोस्ट वाचकांच्या सोयीसाठीप प्रकाशित करत आहोत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..