नवीन लेखन...

शिवराय आणि बाजीरावाचा महाराष्ट्र

दादरा, नगर हवेली, वापी या भागात मी फिरलो आहे. चर्चगेट पासून ते वापी पर्यंत महाराष्ट्र गिळला गेला आहे. उंबरगाव महाराष्ट्रात सामील करण्याचा लढा संपला…. इतिहास जमा झाला.

बेळगाव, कारवार, निपाणीचे लोक महाराष्ट्रात येण्यासाठी महाराष्ट्राच्या दरवाजावर अनेक वर्षे टक्कर देत आहेत. त्यांचा कपाळमोक्ष झाला. कानडी पोलिसांच्या लाठ्या काठ्या खावून त्यांची हाडे पीचली आहेत पण अजूनही ते लढत आहेत. भविष्य अंधक्कारमय झाले आहे.

मुंबई कोणत्या जोरावर म्हणायची मराठी माणसाची ? कर्जत-कसा-याला गेलेला मराठी माणूस मुंबईत ये जा करतोय म्हणून कुठेतरी मराठी शब्द कानावर पडत आहेत. सर्व ठेकेदार, कंत्राटदार अमराठी, स्थानीय लोकाधिकार समिती सुस्त आहे.

विदर्भात महाराष्ट्र अस्मिता कधीच संपलीय. नाही नाही म्हणता विदर्भ चाललाच आहे हातातून ….

आम्ही मात्र बाजीराव मस्तानीचा नाच पाहत फुशारक्या मारतोय. एकेकाळी मराठी माणसाच्या तलवारीच्या धाकानी हिंदुस्थान ढवळून निघाला होता ना …….. त्याच इतिहासात रमलोय !!!

बोला जय भवानी जय शिवाजी ……!!!!

आवाज फाटे पर्यंत घोषणा द्या !!! तेव्हडेच समाधान ……

 

— चिंतामणी कारखानीस

चिंतामणी कारखानीस
About चिंतामणी कारखानीस 75 Articles
चिंतामणी कारखानीस हे ग्राहक संरक्षण सेवा समिती या संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष होते. त्यांना या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल २०१० चा Consumer Awareness Award हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे ते माजी अध्यक्ष आहेत. विविध वृत्तपत्रांत व मासिकांत त्यांचे लेख प्रकाशित झाले असून आकाशवाणीवर भाषणेही प्रसारित झाली आहेत. ते शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रवक्ते आहेत.

1 Comment on शिवराय आणि बाजीरावाचा महाराष्ट्र

  1. नमस्कार.
    छान लेख. पोटतिडीक जाणवते.
    पण, इथें ( एकनाथांच्या शब्दांत सांगायचें तर) ‘दोन आंधळे रे एका दिसेचिना !’
    तरीही आपण ‘अरण्यरुदन’ करत रहायचें, इतकेंच !
    स्नेहादरपूर्वक
    सुभाष नाईक

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..