नवीन लेखन...

रक्षाबंधन व सामाजिक भान

*मी अत्यंत भाग्यशाली आहे की मला अश्या भूमीत जन्म लाभला ज्या भूमीत बहिणींचे, स्त्रियांचे रक्षण** *करण्यास वचनबद्ध होण्यासाठी संपूर्ण एका दिवसाचा उत्सव साजरा केला जातो*.. *स्त्रियांना इतका मान-सन्मान देणारा संपूर्ण विश्वात भारत हाच एकमेव देश आणि हिंदू हाच एकमेव धर्म आहे. अर्थात काही नराधम आपल्या या संस्कृतीला गालबोट लागेल अशी कृत्ये करत असतात. आणि याला कमी अधिक प्रमाणात आपली चित्रपट सृष्टी कारणीभूत आहे. नेमके* *रक्षाबंधांच्याच दिवशी बहिणीवर होणारे अत्याचार तर कित्येक चित्रपटात चित्रित केले गेलेत. शिवाय शासनाची निष्क्रियता अश्या वासनांध नराधमांना जास्तच खतपाणी घालत असते. अन्यथा ज्या पवित्र भूमीत खास स्त्रियांसाठी सण,उत्सव साजरे केले जातात त्या भूमीत या गोष्टी घडल्याच नसत्या*..

असो…

*आज हा बहीण-भावाच्या नात्याचा पवित्र सण भर हिंदुस्थानात साजरा होतोय.. आजच्या या पवित्र दिनी आपण सारे भाऊ मिळून शपथ घेऊ या की या देशातील प्रत्येक स्त्रिचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली असेल. लव्ह जिहाद, धर्मांतरण या सारख्या विळख्यात अडकणाऱ्या प्रत्येक मुलीला,स्त्रीला आपलीच बहीण समजून तिला या विळख्यातून बाहेर काढण्याची शपथ आज घेऊ या.. त्या साठी ती या विळख्यात कशी अडकणार नाही या साठी तिचे प्रबोधन करू या. शाळा कॉलेज, नाते संबंधात, शेजारी-पाजारी, कार्यालयातील स्त्रियांना या विषयी जागृत करू या*..

*आजची स्त्री खरे तर अबला नाहीच*. *ती खमकी आहे. शूर आहे. समजदार आहे*. *तडफदार आहे. कर्तबगार आहे. अश्या भगिनींना सोबत घेऊन इतर सर्व भगिनींना जागृत करू या*.

*भाऊ बहिणीच्या या हिंदूंच्याच आणि हिंदुस्तानच्याच असणाऱ्या या पवित्र उत्सवाच्या सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा*…

|| जय हिंदूराष्ट्र ||

*इवल्या इवल्या हाताने माझ्या राखी तुला बांधेल* !!
*दादा दादा म्हणत तुझ्या मागे मी फिरेन* !!
*गोड गोड खाऊ मी माझ्या हाताने तुला भरवेन* !!
*आपल्या या नात्याला नव आयुष्य लाभेल* !!
*या साठी दादा मला येऊ दे* !!
*आई ला तू सांग ना मला जग पाहू दे*!!
*केवळ परंपरेचा भाग म्हणून रक्षाबंधन साजरे करू नका* !!
*तूमच्या मूलांच्या बहिणींना गर्भातच मारू नका*!!
*कला सूसंगत परंपरांना आमचे नेहमीच वंदन आह*े !!
*गर्भातल्या लेकी-बहिणी वाचवणे हेच आमूचे खरे रक्षाबंधन आहे* !!

Avatar
About वसंत चरमळ 52 Articles
श्री वसंत चरमळ हे जय श्रीराम साखर कारखाना येथे व्यवस्थापक असून विविध विषयांवर नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..