नवीन लेखन...

याला जीवन ऐसे नाव भाग १८

जलाचे दोन प्रकार आकाशातून खाली येणारे आणि जमिनीतून वर येणारे.
त्यातील आकाशातून खाली येणारे पाणी हे जास्त श्रेष्ठ सांगितले आहे.

पावसाचे पाणी जमिनीवर पडण्यापूर्वी स्वच्छ भांड्यात धरणे आवश्यक आहे. जमिनीला स्पर्श झाला की, त्यातील अशुद्धी पाण्यात मिसळायला सुरवात होते.

पाण्याची वाफ होते, त्याचे ढग बनतात ही पाण्याची पहिली शुद्धी आणि ढगाला थंड हवा लागली की त्याची दुसरी शुद्धी. परत पाणी बनते, आकाशातून खाली येते. स्वच्छ आणि शुद्ध असते. परत खाली येताना वायु प्रदूषणामुळे वातावरणातील काही अशुद्धी त्यात मिसळल्या जातात, म्हणून हे पाणी आता शुद्ध करून घ्यावे लागेल. अन्यथा हे पाणी जर प्रदूषण रहित भागातील असेल तर या आकाशीय जलावर कोणत्याही शुद्धी संस्कारांची गरज नाही. देवलोकातील लोकांना जसे अमृत तसे हे अव्यक्तरस आकाशजल मनुष्यांसाठी जीवन आहे, असे ग्रंथकार म्हणतात.

जसे प्रत्येक ठिकाणी उगवणारा सूर्य तोच असतो, पण प्रत्येक गावातील सूर्योदयाची वेळ गावानुसार वेगवेगळी असते. तसेच आकाशातून पडणारे जल तेच असते, पण ते जेव्हा खाली येत असते, तेव्हा ते स्थानिक दोषांनी युक्त होते. शहरी भागात ही अशुद्धी जास्ती असते. पण ग्रामीण भागात ही अशुद्धी कमी आढळते.

जमिनीवर पडले की ते मातीत मुरते. मातीतले गुण त्या पाण्यात येतात. या नियमानुसार कोकणात समुद्र काठाला रहाणाऱ्या लोकांना समुद्रातील पाण्यात असलेल्या अतिरिक्त क्षारांचा सामना करावा लागतो. तर हिमालय कि गोद मे आयोडीनची कमतरता जाणवते. कारण तेथील पाण्यात नैसर्गिक अनुपलब्धतेमुळे आयोडीन मिळतच नाही.

जंगल असलेल्या ठिकाणी पाणी पडले तर ते पचायला हलके होते, तर चिखलमय, दलदल असलेल्या प्रदेशातील पाणी रोग निर्माण करणारे होते. विहिरीतील पाणी हितकर असते. पण तलाव नदी, सरोवर यातील पाणी अहितकर असते.

जसे जमिनी बद्दल सांगितले आहे तसे ऋतुबद्दल पण सांगितले आहे. ग्रीष्म आणि शरद या ऋतुमध्ये पडलेले आकाशीय जल हितकर असते. इतर ऋतुमधे पडलेले जल रोग वाढवणारे असते.

दिवसा नभातून पडलेले जल जास्त चांगले असते, तर रात्री पडणारे जल त्यामानाने वाईट असते.

जेवताना मधे मधे प्यायलेले पाणी पथ्यकर म्हणजेच सर्वांना हितकर असते. पण जेवणाच्या सुरवातीला आणि शेवट घेतलेले पाणी अहितकारक असते, असे शास्त्रकार सांगतात.

पाणी हे शेवटी पाणी असते. ते कुठे पडते यावर त्याचे अस्तित्व अवलंबून असते.

पाण्याचा थेंब मातीवर पडला तर भूमीत विरून जातो, पण तोच एक थेंब विशिष्ट शिंपल्यात पडला तर त्याचाच मोती बनून जातो.

शेवटी पात्र महत्वाचे !

वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
25.12.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..