नवीन लेखन...

‘मृत्युदंड ‘ प्रक्रियेमधील एक दिलासा !

नुकतीच बातमी वाचण्यांत आली की बॉम्ब स्फोटामधील तीन आरोपीना न्यायालयाने मृत्युदंडाची (फाशीची) शिक्षा सुनावली.  एक विचार चक्र मनांत येऊन मी जे.जे. वैद्यकीय महाविद्यालयांतील वाचनालयांत गेलो. एका थोर जागतीक मान्यवर लेखकांचे पुस्तक न्यायवैद्यक शास्त्र Medical Jurisprudence घेतले. ते बराच वेळपर्यंत वाचले. मृत्युचे प्रकार    Mode of death व त्याचे शरीरावर होणारे परिणाम वाचले. त्यावरच्या टिपणी लिहून घेतल्या.

अनेक प्रकारे मृत्यु घडत असतो. जसे जळणे, बु़डणे, विषप्रयोग, आजार, अपघात, इत्यादी. मृत्युच्या शेवटच्या क्षणी सर्व शरीर शिथील व शांत होण्यापूर्वी होणारा प्रतिकार आणि परिणाम ह्या विषयी माझे लेखन होते.  एका प्रकरणांत असलेली टिप्पणी वाचून मी फार चकीत झालो. माझे लक्ष वेधून घेतले गेले. प्रकरण होते लटकावून घडून आणलेला मृत्यु. अर्थात  ‘ Death by Hanging. फाशीमुळे घडणारा मृत्यु ‘ प्रक्रिया नि परिणाम ‘

कोणत्याही मृत्युच्या घटनेमध्ये शेवटचा  क्षण हा भयावह वाटणारा असतो. म्हणून सर्व साधारण व्यक्ती त्याला सामोरे जाताना शरीर व मनाने प्रचंड दबावा खालती असतो. एक प्रकारची तडफड व्यक्त होत असते. वेदना आणि धक्का ( Pain and Shock) हे सर्वाना अनुभव न घेताही ज्ञात असते. व ते एक सत्य  आहे. ‘ Death by Hanging ‘

ह्या प्रकरणातील एक वाक्य होते- “Hanging is a painless form of death ”   जे सुत्र व स्पष्टीकरण वाचण्यांत आले ते खुपच विस्मयकारक व मजेदार वाटले. फाशीबद्दल प्रचलीत गैरसमजाला छेद देणारे होते. वाईटातील चांगले म्हणतात तसे ते मला समाधान देणारे वाटले.

छताला बांधलेला गळफास व्यक्तीच्या माने भोवती टाकला जातो. एकदम त्याच्या पायाखालील आधार काढून घेतला जातो. व्यक्तीच्या वजनाने तो फास त्याच्या माने भोवती आवळला जातो. ह्या प्रकारांत आवळलेल्या फासामुळे मानेतील मेंदूकडे जाणाऱ्या मोठ्या रक्तवाहिन्या व हवेची नलिका ह्यावर प्रचंड दाब येतो. मेंदूला होणारा रक्त पुरवठा एकदम खंडीत पडतो. ताच क्षणी प्राण वायु ह्याचा पुरवठा एकदम बंद पडतो. हा फक्त कांही सेकंदाचाच अवधी, ज्यांत प्राण वायुचा मेंदुला होणारा पुरवठा खंडीत होतो. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे मेंदूच्या मागील मानेजवळच्या भागांत कांही महत्वाचे केंद्रबिंदू असतात. Active brain centers in Medulla Oblongata  त्यावरही दबाव पडून त्यांचे कार्य थांबते. शरीरातील मेंदू हा अवयव प्राणवायुसाठी अत्यंत संवेदनशील असतो. (Brain tissue is Very Sensitive for Oxygen lack). त्याकारणाने प्राणवायु (Oxygen) थोडा जरी मिळाला नाही तरी मेंदू आपले कार्य एकदम थांबवितो. मेंदूचे प्रमुख कार्य हे ज्ञानेद्रियाशी संबंधीत असते. संवेदनांची जाणीव त्वरीत थांबते. शरीराला होणारा त्रास, दुःख, वेदना ह्या सर्व भावना क्षणार्धात लोप पावतात.  एकदम खुंटीत होतात. व्यक्ती त्या परिस्थितीत, त्या क्षणाला वेदना जाणीवरहीत होतो. त्याच प्रमाणे विचाररहीत होतो. न शारीरिक वेदना ना कोणते विचार अशी भावनाहीन स्थिती होते. फक्त बेशुद्धीच्या वाटेवरचे पाऊल. मृत्युच्या दाराजवळ.

मृत्यु हा शरीरापासून अजून थोडासा दुर असतो. प्रकृतीच्या शारिरीक प्रक्रिया अद्यापी चालू असतात. ज्या दिसतात. धडपड, झटक्याच्या हालचाली, होत असतात. पाय, हात, डोळे, जीभ, वा इतर अवयव ह्या प्रक्रियेमध्ये सहभागी होत असतात. बघणाऱ्याला हे सारे क्लेशदायक वा भयावह वाटत असले तरी त्या शेवटच्या १०-१५ मिनीटाच्या धडपडीत हा मृत्युला सामोरे जाणाऱ्या जीवासाठी वेदना, जाणीव विरहीत काळ असतो. हे वैद्यकीय शास्त्र सांगते. म्हणूनच वैद्यकशास्त्रज्ञाने त्या प्रक्रियेला Hanging Painless form of death

संबोधिले आहे.

जर जगाचा इतिहास जर वाचला, मृत्युदंड देण्याची प्रथा पुर्वापार चालत आलेली आहे. शिरच्छेद, उंचावरुन कडेलोट करणे, हत्तीच्या पायी देणे, जाळणे, बंदुकीच्या गोळीने मारणे, दगड बांधून पाण्यांत ढकलने, विष देणे, फाशी देणे इत्यादी. अनेक प्रकारे होते. परंतु सर्व देशानी आजतागायत मृत्युदंड ह्या संकल्पनेसाठी फक्त फासावर लटकावने ह्यास मान्यता दिलेली आहे. कारण ह्यांत मृत्युदंड साधत असतांना, त्या व्यक्तीला मृत्युप्रक्रियेच्या कोणत्याही शारिरीक इजा, वेदना, आथवा जाणीवा होणार नाहीत हे वैद्यक शास्त्राने बघीतले.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..