नवीन लेखन...

‘मराठी भाषा दिना’च्या निमित्ताने

“केवळ काॅन्व्हेंटमध्ये शिकतात म्हणून मुलं ‘आपली’ भाषा विसरत नाहीत, तर त्या भाषेचे जिवंत प्रेम त्यांना घरी कुठेच दिसत नाही व म्हणून ती भाषा मुलं त्याज्य ठरवतात. ‘आम्ही आपल्या भाषेचे प्रेमी आहोत’ असं उठ-सूट बोलण्यापेक्षा, त्या भाषेचे प्रेम मुलांना आपल्या आई-वडीलांच्या जगण्या-वागण्यातून आपसूक जाणवायला लागते आणि ते तसे जाणवले तरच ते पुढे मुलांकडून जोपासले जाते; मग ती कोणत्या का माध्यमातून शाळा शिकेनात.!!”

-पु. ल. देशपांडे

पुलंचा हा उतारा केवळ मराठीच नव्हे प्रत्येक भारतीय भाषेला लागू आहे म्हणून वर केवळ ‘आपली’ भाषा असा उल्लेख केला आहे..! मराठी, गुजराती, मारवाडी अशा सर्वच देशी भाषांबद्दलची त्या त्या भाषीक समाजातील अनास्था वाढत चालली असल्याचे समाजात वावरताना लक्षात येते. इंग्रजी शिकणे म्हणजे स्वत:ची भाषा कमी लेखणे किंवा विसरणे नव्हे हे कोणी लक्षात घ्यायला मागत नाहीय..! त्यात या अनास्थेत ‘सर्वात पुढे महाराष्ट्र माझा’ अशी परिस्थिती आहेच..।!

आजच्या ‘राजभाषा दिना’च्या निमित्ताने मला सांगावसं वाटतं की आपल्या ‘मराठी भाषे’वर प्रेम करा, तिचा रोजच्या व्यहारात अट्टाहासाने वापर करा आणि पुढे असंही सांगेन, की कुणाशी भांडायची पाळी अलीत तर निदान भांडताना तरी मराठीचा वापर करा. एक दणदणीत वाक्य मराठीत फेकून मारा, बघा, समोरचा पन्नास टक्र्याने तरी खाली येतो की नाही..!

भांडणावरून विषय आला म्हणून सांगतो, घरी मुलाला किंवा मुलीला शाळेत घालायची वेळ येते, तेंव्हा त्याला किंवा तिला कोणत्या शाळेत घालावं यावरून छोटेसे वाद होतात. फार कमी घर याला अपवाद असतील. वाद कोणत्या शाळेत म्हनजे कोणत्या माध्यमाच्या शाळेत घालावं यावरून होतात. इथे आश्चर्याची होष्ट अशी की मातृभाषेच्या शाळेत घालण्यास बहुतेक घरात ‘मातृ’पक्षाचाच विरोध असतो. यालाही अपवाद असतील पण ते ही कमीच.

लोकलच्या प्रथमवर्गीत सो काॅल्ड हाय सोसायटीतील दोन मराठी माणसं भांडताना (म्हणजे वेगळ्याप्रकारे चर्चा करताना) हटकून इंग्रजीत वाद घालताना दिसतात. दुस-या वर्गात इंग्रजीची जागा हिन्दी घेते. खरंतर मराठी ही लढवय्यांची भाषा असताना व प्रेमापेक्षा लढण्यालाच उद्युक्त करणारे अनेक शब्दप्रयोग मराठीत असताना निदान भांडताना तरी इतर भाषांचा आधार का घ्यावा लागतो हेच मला कळत नाही. (याचा अर्थ मराठी भांडखोरांची भाषा आहे असं नाही. खरं तर मराठीजनांएवढी सहनशील जमात देशात कुठे सापडू नये. प्रेमाने मागाल तर कांसेची लंगोटी देतील परंतू गृहीत धरून चालाल तर मात्र तुमची खैर नाही. अन्याया विरूद्ध , मग तो कोणावरचाही असो, लढण्यासाठी धावतो तो लढवैया मराठीच..!) खरंतर मराठी शिवी ही जगातील पहिल्या दोन क्रमांकात येते जाते ( पहीला क्रमांक पंजाबी). मराठीतली शिवी एके ५७ च्या गोळीसारखी सण्णकन लागून समोरच्या माणसाला घायाळ करून जाते.

नाहीतरी मराठी माणसाला भांडल्याशिवाय कुठे काय मिळालंय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिन्दवी स्वराज्यापासून ते मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रापर्यंत मराठी जनांनी सर्व भांडूनच मिळवलंय. आणि भांडल्याशिवाय जे मिळतं त्यात आपल्याला गोडी वाटतंच नाही हे ही तेवढंच खरं. फक्त दुर्दैव येवढच की आता मराठी भाषेसाठी स्वत:ला मराठी म्हणवणाऱ्या लोकांशीच भांडायची वेळ आली आहे. तेवढं मात्र होऊ देऊ नका ही कळकळीची विनंती..

-नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..