नवीन लेखन...

मनाचे श्लोक – ४१ ते ५०

बहु हिंडता सौख्य होणार नाही | शिणावे परी नातुडे हीत कांही |
विचारे बरे अंतरा बोधवीजे | मना सज्जना राघवी वस्ति कीजे ||41||

बहूतांपरी हेचि आता धरावे | रघूनायका आपुलेसे करावे |
दिनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे | मना सज्जना राघवी वस्ति कीजे ||42||

मना सज्जना एक जीवी धरावे | जनी आपुले हीत तूवा करावे |
रघूनायकावीण बोलो नको हो | सदा मानसी तो निजध्यास राहो ||43||

मना रे जनी मौनमुदा धरावी | कथा आदरे राघवाची करावी |
नसे राम ते धाम सोडूनि द्यावे | सुखालागि आरण्य सेवीत जावे ||44||

जयाचेनि संगे समाधान भंगे | अहंता अकस्मात येऊनि लागे |
तये संगतीची जनी कोण गोडी | जिये संगतीने मती राम सोडी ||45||

मना जे घडी राघवेंवीण गेली | जनी आपुली ते तुवा हानी केली |
रघूनायकावीण तो शीण आहे | जनी दक्ष तो लक्ष लावूनि पाहे ||46||

मनी लोचनी श्रीहरी तोचि पाहे | जनी जाणता भक्त होऊनि राहे |
गुणी प्रीति राखे क्रमू साधनाचा | जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ||47||

सदा देवकाजी झिजे देह ज्याचा | सदा रामनामे वदे नित्य वाचा |
स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा | जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ||48||

सदा बोलण्यासारिखें चालताहे | अनेकीं सदा एक देवासि पाहे |
सगूणीं भजे लेश नाहीं भ्रमाचा | जगीं धन्य तो दास सर्वेत्तमाचा ||49||

नसे अंतरी काम नाना विकारी | उदासीन जो तापसी ब्रह्मचारी |
निवाला मनी लेश नाही तमाचा | जगी धन्य तो दास सर्वेत्तमाचा ||50||

– श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक   (क्रमशः) 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..