नवीन लेखन...

किचन क्लिनीक – पालेभाज्या – पुनर्नवा – (वसुची भाजी /घेटुळी)

ह्याचे प्रसरणशील व बहुवर्षायू क्षुप असते.हे २-३ फुट लांब असते हिचे पांढरा व लाल असे दोन प्रकार असतात.त्यातील पांढरी पुनर्नवा हि प्रामुख्याने भाजी करीता वापरतात.हि भाजी पथ्यकर असली तरी देखील ब-याच प्रमाणात उपेक्षित आहे.म्हणुनच हिचा उपयोग व गुण जाणून घेणे गरजेचे आहे.

हि भाजी पावसाळयात भरपूर वाढते.अाणी हिचे पुष्कळ औषधी उपयोग आहेत.पांढरी वसुची भाजी अथवा घेटुळी हि चवीला तिखट,कडू,तुरट,व गोड असते.हि उष्ण गुणाची असते व शरीरातील वात,पित्त व कफ हे तिन्ही दोष कमी करते.

हिचे औषधी उपयोग पाहूयात:

१)व्रणातील स्त्राव कमी करायला वसुच्या पानांचा रस काढुन तिचा लेप लावावा.

२)सुज आली असल्यास पुनर्नवा+देवदारू+सुंठ+वाळा ह्याचा काढा गोमूत्र घालून घ्यावा.

३)कफयुक्त दम्याचा त्रास होत असल्यास पुनर्नवाचा काढा वेखंड घालून घ्यावा.

४)पचन नीट न होत असल्यास पाल्याची भाजी, सुप किंवा त्याच्या पाल्याचा रस नियमीत काही दिवस घ्यावा.

५)कावीळीमध्ये पुनर्नवा रस १-११/२ महीना घ्यावा व यकृताचा अशक्तपणा कमी होतो.

६)घाम मुळीच येत नसेल तर त्वचा कोरडी होते व फुटू लागते व त्वचेवरील लव देखील गळू लागते त्यावेळी पुनर्नवेच्या पानांचा रस अंगास चोळावा व त्याची भाजी खावी.

हि भाजी जास्त प्रमाणात खाल्ल्यास अतिप्रमाणात संडास व लघ्वी होऊ शकते.

— वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४

वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर
About वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर 202 Articles
वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर गेली १० वर्षे गोव्यामध्ये म्हापसा शहरात आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीकच्या माध्यमातून पंचकर्म, आहार मार्गदर्शन, सुवर्णप्राशन असे उपक्रम राबवीत आहेत. लेखनाची आवड असल्याने त्या विविध स्थानिक वृत्तपत्रातून आयुर्वेद व सामाजिक समस्यांशी निगडीत लेखन त्या करतात तसेच आरोग्यसंबंधित विषयांवर शाळा, कॉलेज इ मध्ये व्याख्यान देतात. आहार या विषयात जास्त रूची असल्याने व त्यावर अभ्यास आणि वाचन असल्याने त्यांनी आपला किचन क्लिनीक या सदराद्वारे ऑनलाईन लिखाण सुरु केले आहे. त्या आरोग्य भारती व जायंट्स ग्रूपच्या सदस्य देखील आहेत. आयुर्वेद शास्त्राचा जमेल तेवढा अभ्यास करून त्याचा प्रचार व प्रसार करण्याची त्यांची मनीषा आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..