नवीन लेखन...

पाय मुरगळणे

हल्ली जीवनशैली कमालीची व्यस्त बनली आहे. सतत धावपळ हा आजच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनला आहे. अशावेळी कितीही काळजी घेतली तरी काही अपघात घडतात. यामध्ये एक म्हणजे पाय मुरगळणे. काही वेळा चालताना, पायर्या उतरताना पाऊल किंचित तिरके पडते आणि पाय मुरगळतो. पाय मुरगळतो तेव्हा पायातील सांध्यांच्या दोन हाडांना जोडणार्याि उती अर्धवट फाटतात किंवा काही वेळा पूर्णही फाटतात. असे झाले तर पायाच्या घोट्याजवळ सूज येते. सूज आली असता त्या भागावर बर्फाने शेक द्यावा. बर्फाने शेकण्याचीही एक विशिष्ट पद्धत आहे. बर्फाचे खडे जाडसर पिशवीत घेऊन त्यात थोडे मीठ घालावे. पिशवीला गाठ मारावी आणि दुखत असणार्याख जागेवर ही पिशवी काही वेळ ठेवावी. वेदना तीव्र होईपर्यंत ही पिशवी तशीच ठेवावी. नंतर पुन्हा ती दुसर्याे जागेवर ठेवावी. अशा प्रकारे सलग 15 मिनिटे बर्फाने शेकावे. दिवसातून साधारणपणे दोन वेळा बर्फाचा शेक द्यावा. मुरगळल्यानंतर पायाला पूर्ण विश्रांती द्यावी. पाय शक्यतो उशांवर ठेवावा. बाजारामध्ये पायाला बांधण्यासाठीचे बँडेज मिळते. ते पायाच्या बोटांपर्यंत बांधावे जेणेकरून पायांच्या स्नायूंना आधार मिळतो आणि सूज लवकर कमी होण्यास मदत होते.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. डॉ. संजय गायकवाड

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..