नवीन लेखन...

पद्य आणि मृत्युविचार : भाग – ११ / ११

निष्कर्ष आणि समारोप :

मृत्यू हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे, व त्यामुळे अनेकविध पद्यांमध्ये विविध संदर्भांनी मृत्यूचा उल्लेख येतो. या विषयावरील काव्यात काय आवश्यक आहे, तर, भावनेची आर्तता, कांहीं दार्शनिक (philosophical ) मननचिंतन, समाजभान-संबंधित विवेचन, किंवा असाच कांहींतरी ‘संजीदा’ ( गंभीर, serious ) विचार. त्यासाठी, नवनवीन प्रतिमा व उपमा-रूपक यांसारखे अलंकार अत्यावश्यक  (a must) वाटत नाहींत ;  अर्थात् , असले,  व त्यांमुळे जर सौंदर्य वाढलें, तर कांहींच  हरकत नाहीं . मुख्य म्हणजे, काव्य मनाला भिडलें, त्यानें विचारप्रवृत्त केलें की, तें वाचकांच्या हृदयापर्यंत पोंचतें, आणि तेथें जीवित रहातें.

म्हणूनच ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके म्हणतात –

असेन मी नसेन मी तरी असेल गीत हें.

  • ( एक भावगीत)

 

उर्दूचा एक शायरही हेंच वेगळ्या शब्दांत सांगतो –

हम तो मरकर भी किताबों में रहेंगे ज़िंदा

ग़म उन्हीं का है, जो मर जाएँ तो गुज़र जाते हैं ।

 

अखेरीस  :

तुमच्यामाझ्यासाठी,  Zen-Priest Tai Sheridan  याचें चिंतन मार्गदर्शक ठरावें –

Until you relax

in the core of yourself,

it is impossible to

make peace with death.

 

या ओळींची तुलना याच काव्यातील एका अन्य कडव्याशी करावी, जें आधी ( भाग -२ मध्ये ) दिलेलें आहे.

In the still waters, golden light

may you imbibe the gentle truth

Relax, you are going to die.

मरण, जें टळणें अशक्य आहे, त्याचा मनोमन स्वीकार करणें , एवढेंच आपल्या हातात असतें ; आणि तसें केल्यानें आपलें जीवन सु-सह्य तर होईलच ; पण तें सु-फल होईल, सु-शांत होईल. मृत्यूविषयींच्या काव्यातून आपण एवढें शिकूं शकलो तरी पुरें.

 

(संपूर्ण)

— सुभाष स. नाईक
Subhash S. Naik

 

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..