नवीन लेखन...

निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग सोळा

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे बावीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा

नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

पदार्थ उघडा ठेवू नये
तयार झालेला पदार्थ उघडा ठेवल्यास, भूमार्गाने येणारे झुरळ मुंगीआदि गण, आकाशमार्गाने येणारे किटक, डास, घरमाशी, कोळी इ. उपद्रवी जीव अन्न पदार्थात जाऊ शकतात. आणि अन्न विषमय होऊ शकते. किंवा उंदीर, पाल आदि जीवांची विष्ठा अन्नामधे पडू शकते. हे लक्षात असावे. नाहीतर दूषिविषाला (प्राण्यापासून निर्माण होणारा जंतुसंसर्ग, म्हणजे दूषीविष.) सामोरे जावे लागते. म्हणून आई ओरडायची. पदार्थ उघडा ठेवू नये. त्यावर झाकण घालून ठेवावे.

दुधावर फुंकर घालू नये
दुधावरची साय बाजूला करण्यासाठी पातेल्यातील दुधावर फुंकर घालू नये. साय बाजूला करताना त्यावर तोंडातील लाळ, थुंकी उडण्याची शंका असते. पुनः जन्तु संसर्ग होण्याची शक्यता वाढते. म्हणून साय चमच्याने बाजूला करावी. यात गैर काय आहे? आजच्या भाषेत आपल्या हायजिनसाठी हे आवश्यक वाटते.

पिंपात तांब्या बुडवू नये.
तांब्याच्या तळाला लागलेला कचरा, माती पिंपात जाण्याची शक्यता असते. पिंपातील सगळेच पाणी फुकट जाऊ शकते, ही शक्यता लक्षात घेऊन ही सूचना असते.

पातेलं खरडून वाढू नये
ज्याला मॅनर्स म्हणतात, त्यातील हा एक प्रकार आहे. पातेलं खरडून वाढताना रिकाम्या पातेल्याचा जो आवाज येतो, तो जेवणा ऱ्या च्या मनात संभ्रम निर्माण करतो, पातेल्यातील जिन्नस संपला असेल तर आपण आणखी मागायला नको, असे त्याला वाटून जेवणारा, अर्धपोटी उठू शकतो, त्याचा “अन्नदाता सुखी भव” हा आशीर्वाद मिळण्यासाठी पातेलं खरडण्याचा आवाज वाढताना होऊ नये.

काही जणांना वाटेल काय हे एवढी साधी गोष्ट कळत नाही का आम्हाला? एवढे बुद्धु आहोत का ? पण काही वेळा साध्या गोष्टी मागील मर्मच लक्षात येत नसते, त्या कोणी एका शास्त्रज्ञाने म्हणे, मोठ्या मांजराला घरातून बाहेर जाण्यासाठी एक भोक आणि लहान पिल्लांना बाहेर जाण्यासाठी वेगळे लहान भोक ठेवले होते म्हणे !

मुलांचे चालीने चालावे
मुलांचे बोलीने बोलावे
तैसे जनास सिकवावे
हळूहळू
असे समर्थ देखील म्हणतात.

ताटाच्या बाहेर सांडू नये
भूतदया असावीच, त्यांच्यासाठी चार शीते ताटाबाहेर काढूनही ठेवावीत, पण आपण जेवत असताना अन्न ताटाबाहेर पडत तर नाही ना याची काळजी देखील घ्यावी. अन्नाचा एकही कण वाया जाऊ न द्यावा. ताटाबाहेरच नव्हे तर ताटात देखील अन्न टाकू नये. जेवढे हवे तेवढेच वाढून घ्यावे. हावरटपणाने वाढून घेऊन, नंतर ताटात टाकणे आईला पसंत नाही.

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
११.०८.२०१७

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..