नवीन लेखन...

देव ही संकल्पना

अनेक योनी ही निसर्गाची निर्मिती आहे. सजीव प्राण्यांमध्ये झाडे, वनस्पती, क्रिमी, किटक, पक्षी, जनावरे इत्यादी अनेक प्रकारचे सजीव आहेत. यांची चक्रमय योजना त्याने आखलेली आहेत. सुक्ष्मापासून प्रचंड देहधारी व ज्ञानाच्या प्रातांत अत्यल्प ज्ञानापासून प्रचंड ज्ञान प्राप्त रचना निसर्गाने आखलेली आहेत. प्रत्येक सजीव हा आपापल्यापरी एक सर्वक्षम, परिपूर्ण असतो. स्वत:च्या जीवनाची चाकोरी व चक्र अतिशय काटेकोरपणे पूर्ण करण्याची  क्षमता प्राप्त अशी ही रचना आहे. जर अत्यंत बारकाईने त्याच्या ह्या जीवन रचनेचा विचार केला तर हे चक्र जवळ जवळ सारखेच प्रतीत होते. उत्पत्ती, स्थिती व लय  ह्या चक्रांत जीवनाचा उच्च निचतेचा भाव कोठेच निर्माण होत नसतो. ते निसर्गाला केव्हांच मान्य नाही. प्रचंड उत्क्रांत झालेला मानव हा देखील काळानुसार अत्यंत सुक्ष्म अशा क्रिमी, जंतूचे देखील खाद्य होवून जाते. एक जीव दुसऱ्यावर जगवा हीच तर त्या ईश्वराची मूलभूत कल्पना आहे.

“ जीवः जीवस्य जीवनम ” म्हणतात ते ह्याचमुळे. ईश्वरांनी विचार क्षमता अर्थात ज्ञान ह्याची देणगी मानव जातीला जास्त प्रमाणात बहाल केली. कदाचित त्याची योजना असावी की मानव प्राण्याने निसर्गाच्या दैनंदीन सृजनात्मक क्रियामध्ये त्याला मदत करावी. परंतु झाले मात्र विपरीत. तो त्याच ज्ञान साठ्याचा दुरुपयोग करु लागला. वेगळाच उपयोग घेण्याचे योजू लागला. हेच ज्ञान आपल्या जगण्याच्या समस्या उलगडू शकते. आपल्या अस्तित्वामध्ये श्रेष्ठता ही निर्माण करु शकते. आपल्या इतर सर्व सजीव वा निर्जिवामध्ये आपले महत्त्व, मानसन्मान स्थापित करण्यास मदत करु शकते, हे त्याच्या लक्षात आले. निरनिराळ्या क्लुप्त्या करुन आपण सर्वात श्रेष्ठ आहोत, ह्याचा त्याने निरनिराळ्या माध्यमाने प्रयत्न केला . केवळ ज्ञानाच्या जोरावर प्रचंड जगांत, ज्यात डायनोसार, ड्रॅगन, वाघ, सिंह, हत्ती, मगर, अजगर, एनाकोंडा, गेंडा, हिप्पोपोटामस, सर्प, अवाढव्य असे मासे, जलचर प्राणी इत्यादी प्रचंड शक्ती प्राप्त, भयानक प्राणी ह्यांच्यावर संपूर्णपणे ताबा मिळवला. त्यांना अंकीत केले. आपल्या अधिकार क्षमतेमध्ये आणले. परिणाम झाला तो मानव सर्वांमध्ये श्रेष्ठ ठरला. हे सारे केवळ विचार ज्ञान संपदेच्या अधिपत्यामुळे. तसा शारिरीक शक्तीमध्ये तो कित्येक प्राण्याच्या तुलनेत अत्यंत कमी पडतो. एखादा क्षुल्लक डास वा क्रिमी किटक देखील त्याला जगणे मुश्किल करु शकतो. शक्ती सामर्थ्यांत तो इतर प्राण्याच्या केव्हांच वरचढ होऊ शकणार नाही. फक्त गनीमी कावा, चकवा तंत्र, विश्वासघात इत्यादी आयुष्याचा तो कौशल्याने उपयोग करतो. केवळ विचार, ज्ञान यांच्या सामर्थ्यांमुळे मात करतो.

विचार व ज्ञानसाठा जेव्हा विकसीत होऊ लागला, तेव्हा त्याला जीवनचक्रांत कोणताही सजीव वा निर्जीव द्वंदात्मक, बरोबरी करणारा, आवाहन देणारा राहीला नाही. सर्वांवर त्याचे वर्चस्व स्थापीत होऊ लागल्यामुळे तो एक अजींक्य असा बनू लागला.

परंतु म्हणतात ना, ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..