नवीन लेखन...

तानसेनाचं दैवी गाणं

तानसेनाचं दैवी गाणं ऐकून जेव्हा जेव्हा अकबर मंत्रमुग्ध व्हायचा, तेव्हा तेव्हा तानसेन विनम्रपणे सांगायचा, माझ्या गुरूंपुढे मी काहीच नाही.

अकबर म्हणायचा, असं शक्यच नाही. या भूतलावर तुझ्याइतका श्रेष्ठ गायक कोणी असूच शकत नाही. कसला गुरूबिरू सांगतोस.

तानसेन म्हणायचा, माझ्या गुरूंच्या गायनापुढे माझं गायन म्हणजे सूर्यापुढे पणती.

अकबर म्हणाला, मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. माझ्या कानाने ऐकूनच काय तो निर्वाळा देईन. बोलव तुझ्या गुरूंना. काय असेल ती बिदागी देऊयात आपण. होऊन जाऊदेत त्यांचं गाणं.

तानसेन म्हणाला, जहाँपनाह, ते अशा मैफली सजवत नाहीत. त्यांचं गाणं फक्त त्यांच्यापुरतं असतं.

अकबर म्हणाला, मग त्यांची जी काही गाण्याची वेळ असेल, त्यावेळी जाऊन आपण बसू ऐकायला.

तानसेन म्हणाला, त्यांची अशी ठराविक वेळ नसते. त्यांना वाटलं की ते गातात. ते कोणाहीसाठी गात नाहीत.

अकबराने विचारलं, मग त्यांचं गाणं ऐकायचं कसं?

तानसेन अकबराला मध्यरात्रीच्या सुमारास लपून छपून गुरूदेवांच्या झोपडीपाशी घेऊन गेला. दोघेही बराच काळ वाट पाहात बसले होते. अशा दोन रात्री वाट पाहण्यात घालवल्यानंतर एके दिवशी पहाटेच्या सुमारास गुरुजींनी गाणं सुरू केलं. ते स्वर्गीय गाणं ऐकल्यावर अकबराचं देहभान हरपून गेलं. दीडदोन तासांनी ते गायन थांबलं, तेव्हा अकबर जणू वेगळ्याच विश्वातून जमिनीवर परत आला.

आकंठ तृप्त मनाने दोघेही एकमेकांशी चकार शब्द न बोलता राजवाड्यापर्यंत आले. मनात काठोकाठ भरून डचमळणारं गुरुजींचं गाणं थोडं स्थिरावलं होतं. अकबराने तानसेनाला विचारलं, तूही गातोस. तेही गातात. तुझं गाणं अद्वितीय आहे. पण, त्यांचं गाणं स्वर्गीय आहे. हा फरक कशामुळे?

तानसेन म्हणाला : मी काहीतरी मिळावं म्हणून गातो . ते काहीतरी मिळालंय , ते वाटून टाकल्याशिवाय राहवत नाही , म्हणून गातात .

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..