नवीन लेखन...

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग सहा

“शरीर जे करते, ते शरीराच्या हितासाठीच असते. ” भाग तीन

झोप येते आहे, पण झोपायचे नाही, भूक लागली आहे, पण जेवायचे नाही. तहान लागली आहे पण पाणी प्यायचे नाही. एक नंबर दोन नंबर होते आहे, पण जायला वेळच नाही, असे वारंवार होत असेल तर समजावे, पुढे नक्कीच काहीतरी रोगाची सुरवात होऊ शकते ! शरीराची ही मागणी गरज लगेच पुरवली पाहिजे. अन्यथा एखादा अवयव संपावर जाऊ शकतो.

शरीर जे मागतंय ते पुरवावं लागतंच. आणि जे मागत नाही ते देऊ नये. हा साधा सोपा सिद्धांत आहे.

घड्याळ बघून जेवू नये. आपल्या शरीराला आपण जशी सवय लावावी तशी लागते. निरागस लहान मुलं बघा, त्यांची भूक त्यांना ओळखता येते. तेवढंच अन्न ती घेतात. पोट भरलं की, कितीही आवडीचं असो, तोंड उघडणारच नाही. जबरदस्तीने भरवायला गेलात तर उलटी करतील. किंवा फुऽर्रऽर्र करतील. आता मूल उलटी करतेय म्हणून जर उलटी थांबवणारे औषध दिलं तर ? शरीराच्या नियमाच्या विरोधात काम होईल. हेच औषध पुढे रोगाचे कारण बनेल. लहान मुलांमध्ये, उलटी करणे ही एक चिकित्सा आहे.

मुलांचे सोडा हो, मोठी मंडळी देखील उलटी थांबवण्यासाठी उठसूठ पित्तशामक औषधे खात बसतात. काही पित्तशामके पोटातल्या पोटात पित्तशमन करतात, तर काही थेट मेंदूमधून सूचना देऊन पित्त निर्माण प्रक्रियाच थांबवतात. बाहेर पडणाऱ्या पित्ताला बाहेरच पडू दिले नाही तर ते आतच रहाणार. एवढी अॅण्टासीड खात असतात, की या अॅण्टॅसिडमुळेच पुढे पित्ताशयाला सूज येणे, त्यात खडा होणे असे गंभीर आजार होतात. यावरचे उपाय तर रोगापेक्षा खतरनाक ! पित्ताशयच मुळातून काढून टाकायचे म्हणे !

अवेळी खाणे पिणे, नको ते खाणे पिणे, नको तेवढे जागरण करणे, शरीराच्या गरजांचा विचार न करता, फक्त जीभेला हवंय म्हणून खाणे, या कारणांनी पित्त वाढते. आणि “आम्ही चुका करणारच”, असे ठरवून आधी पित्त वाढवून घ्यायचे, आणि वर पित्त वाढते म्हणून पुनः अॅण्टॅसिड.

हीच आपली जीवनपद्धती झाल्यावर आणखी काय बोलणार ना !!

— वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
15.04.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..