नवीन लेखन...

गोल्डी उर्फ विजय आनंद

विजय आनंद हे देव आनंद आणि चेतन आनंद यांचे लहान भाऊ. त्यांचा जन्म २२ जानेवारी १९३४ रोजी झाला.वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी देव आनंदच्या टॅक्सी ड्रायव्हरसाठी पटकथा लिहून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार्यार मा.विजय आनंद यांनी दिग्दिर्शित केलेला पहिला चित्रपट हा नौ दो ग्यारह. देव आनंद आणि कल्पना कार्तिकच्या भूमिका असलेल्या या रहस्यपटानंतर त्यांनी काला बाझार या चित्रपटात नोकरी मिळवण्यात आणि मिळालेली टिकवण्यात अपयशी ठरलेल्या, आणि मग वाममार्गाला लागलेल्या तरूणाची कथा सादर केली. यात त्यांनी एक छोटीशी पाहुण्या कलाकाराची भूमिकाही केली होती. या चित्रपटात एका गाण्याच्या आधी एक अप्रतीम दृश्य आहे. नायक देव आनंद वाममार्गाने भरपूर पैसे कमावतो आणि एके दिवशी आई-बहिणीसाठी कपडे आणि दागिने घेउन घरी येतो. जिना चढताना त्याला ठेच लागते, सगळे दागिने वगैरे वस्तू इतस्ततः पडतात आणि त्याच वेळी सुरु झालेल्या भजनातल्या ‘ना मै धन चाहूं, ना रतन चाहूं’ या शब्दांनी सदसदविवेकबुद्धी जागृत असलेला नायक एकदम चपापतो. मा.विजय आनंद यांना सस्पेन्स सिनेमांचा बादशाह समजले जायचे. त्यांचे ‘तिसरी मंझिल’, ‘काला पानी’, ‘ज्वेल थीफ’ हे रहस्यमय सिनेमे आज इतक्या वर्षांनंतरही वारंवार पाहिले जातात, त्यातलं रहस्य माहिती असूनही. मा.विजय आनंद यांनी रहस्यपटांमध्ये प्राविण्य मिळवलं होतं. १९६६ साली आलेला तीसरी मंझील हा १९५७ सालच्या नौ दो ग्यारह नंतरचा मा.विजय आनंद यांचा पुढील रहस्यपट. निर्माता नासीर हुसेनशी झालेल्या कडाक्याच्या भांडणानंतर देव आनंद या चित्रपटातून बाहेर पडले होते. पण दिग्दर्शकाच्या भूमिकेत मा.विजय आनंद मात्र तसेच राहिले. देव आनंद यांच्या जागी नायक म्हणून आलेल्या मा.शम्मी कपूर यांची मनस्थिती गीता बाली हे जग सोडून गेल्या मुळे ठीक नव्हती. शम्मी कपूर यांची मानसिक अवस्था लक्षात घेत त्याला सांभाळून घेऊन अशा नाजूक परिस्थितीतही मा.विजय आनंद यांनी हा चित्रपट ठरवलेल्या वेळेत पूर्ण केला. चित्रपटातील पात्रांपेक्षा कॅमेरा हाच प्रमुख निवेदक असला पाहिजे याची जाणीव असलेल्या गोल्डीने सिनेमातील पात्रांच्या बरोबर फिरत असलेल्या कॅमेर्यािच्या वेगवान हालचाली, तुकड्यातुकड्यात चित्रीत केलेली दृश्ये एकत्र गुंफणे अशा करामतींचा प्रभावी वापर करून हिंदी चित्रपटांच्या इतिहासातल्या उत्तम थरारपटांपैकी एकाला जन्म दिला. विजय आनंद यांनी पुढच्याच वर्षी ज्वेल थीफ हा आणखी एक जबरदस्त रहस्यपट दिला. उत्कृष्ठ पटकथा-संवाद लेखक असलेल्या गोल्डी यांना या सिनेमात दिग्दर्शनाबरोबर याही गोष्टी करायला मिळाल्याने असलेल्या स्वाभाविक स्वातंत्र्याचा पुरेपूर उपयोग करत अनेक अनेक नव्या गोष्टी समोर आणल्या. ‘कहीं और चल’ हा चित्रपट दिग्दर्शित केल्यावर फायनॅन्सरकडून फसवणूक वाट्याला आलेल्या गोल्डीने नायक म्हणून कारकीर्द उताराला लागलेल्या देव आनंदला ‘जॉनी मेरा नाम’ मार्गे यश मिळवून दिलं. ‘तेरे मेरे सपने’ बरोबरच त्यांनी अनेक चित्रपटात नायकाची भूमिकाही केली, पण त्यातले ‘मै तुलसी तेरे आंगन की’ आणि कोरा कागज’ हे दोनच उल्लेखनीय म्हणावे लागतील. कालांतराने त्यांनी ‘तहकीकात’ या दूरदर्शन मालिकेत डिटेक्टिव्ह सॅमच्या रूपात आपल्यातल्या अभिनयाची पुन्हा एकदा चुणूक दाखवली. रेडिओ मिर्ची पुरस्कृत पुरानी जीन्स फिल्म महोत्सवात मा.शम्मी कपूर यांना एका पत्रकाराने एक प्रश्न विचारला होता. ” तीसरी मंझील हा चित्रपट पुन्हा बनवायचा झाला तर नायकाच्या भूमिकेसाठी सद्ध्याच्या अभिनेत्यांपैकी तुम्हाला कोण योग्य वाटतो?” “मला नाही वाटत हा चित्रपट पुन्हा कुणी बनवू शकेल” प्रचंड आत्मविश्वासाने क्षणाचाही विलंब न लावता मा.शम्मी कपूर ताडकन् उत्तर दिले होते. चित्रपट्सृष्टीतील अनेक कलावंतांप्रमाणे विजय आनंदही काही काळ सेन्सॉर बोर्डाचा अध्यक्ष होते. पण त्याने केलेल्या अनेक सूचना आणि नाविन्यपूर्ण कल्पना धुडकावल्या गेल्यावर गोल्डीने बाणेदारपणा दाखवत पदाचा राजीनामा दिला. विजय आनंद यांचे २३ फेब्रुवारी २००४ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..