नवीन लेखन...

गेले ते दिन गेले !

असले जरी शिक्षण बेताचे

वागलो नाही कधी विचित्र,

चाळीतील मध्यमवर्गी आम्हीं

राहत होतो एकत्र !

 

चाळीने आम्हांला शिकविले

भेदभाव विसरायला,

प्रसंग कोणावर बिकट आला

शिकविले प्रथम मदत करायला !

 

चाळीत कॉमन नळाला

पहाटे पाचला पाणी,

सातवाजता पाणी गेल्यावर

मिळणार नाही थेंब पाणी !

 

ब्रशने दात घासता घासता

भरभर प्रातर्विधी उरकायचे,

दुधासाठी सेंटरवर धावायचे

मध्येच घुसून दुध आणायचे !

 

पाण्यासाठी सगळ्यांची लगबग

सकाळी भांडणं कायमची,

पाणी जायच्या आत

सगळी आन्हिके उरकायची !

 

चाळीतील कॉमन नळाने

शिस्त लावली लौकर उठायची

पाण्याची काटकसर करण्याची

पाणी जपून वापरायची !

 

थंडीचे दिवस म्हणून

उठलो नाही लौकर,

शाळेला उशीर होईल

म्हणून अंघोळी केली भरभर !

देवापुढे जोडून हात

घाईघाईत नाष्टा केला,

पँटीत शर्ट कोंबून

शाळेचा रास्त घराला !

 

आदल्या दिवशी विसरलो

दप्तरात पुस्तके भरायला,

पहिला तास गणिताचा

भलताच भारी पडला !

 

येउदे प्रसंग कोणावर काही

एकजुटीने लढणारच,

आमची चाळ आहे म्हंटल्यावर

त्यात वाचाळ काही असणारच !

 

चाळीतल्या गमतीजमती वेगळ्या

फॅल्याट सिस्टीम मध्ये कुठे दिसायला !

भांडलो जरी किती तरी

शेजारी येती सोडवायला !

 

— जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..