नवीन लेखन...

गाढवं; बांधुनही न बांधलेली

कबीराने एका रचनेमध्ये गाढवांना बांधण्याच्या पद्धतीची माहिती दिली आहे, ती मनोज्ञ आहे..

…गाढवाला खुंटीला बांधलं आणि गाढवाचा मूड खराब असला, तर गाढव खुंटी उखडून खुंटीसकट पळून जाऊ शकतं.

…शहाणा कुंभार गाढवांना जोडीजोडीने बांधतो… म्हणजे त्यांना खुंटीला बांधत नाही, एकमेकांशी बांधतो. गाढवं जागची हलत नाहीत. हलूच शकत नाहीत. कारण दोन्ही गाढवांनी पळून जायचं ठरवलं, तरी एक गाढव डावीकडे खेचतं, एक उजवीकडे. दोघेही जागच्या जागीच राहतात….याच्यावरूनच लग्नाची कल्पना सुचली असावी..

व्बाट्सअॅपवर आलेला हा एक विनोद. मला मात्र यात विनोदाबरोबरच आपल्या समाजातील एक सद्यपरिस्थ्तितीही दिसली. ती मी माझ्या शब्दांत व्यक्त केली ती अशी-

या गाढवांची आणखीही एक गंम्मत मला ऐकून माहित आहे. प्रत्यक्षातल्या गाढवांना बांधायचीही गरज नसते. फक्त बांधल्याची अॅक्टींग करायची, मग ते त्यांना बांधलंय असं समजून जागचे हलत देखील नाहीत. हे ही प्रत्यक्षातल्या आणि वरील विनोदात उल्लेखलेल्या ‘गाढवां’मधलं साम्यच नाही का?

तरी हल्ली विनोदातली ‘गाढवं’ स्मार्ट होत चाललीत हे टिव्ही सिरियल्स पाहून कळतंय..फक्त मंत्र म्हणून सात पावलं चललोय, आपल्याला काही बांधलेलं नाही हे त्यांना कळायला लागलंय आणि बांधलेली राहून देखील उकीरडा फुंकतायत. आणि त्यांना बांधणाऱ्या बिचाऱ्या ‘कुंभारा’ना वाटतंय की आपण ‘गाढवां’ना बांधून ठेवलंय म्हणून..

-नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..