नवीन लेखन...

किळस आलीय आम्हाला तुमची..

भाजपा-सेना यांच्यातली ‘लोकसेवे’साठी चालणारी झोंबाझोबी पाहून मन कसं भरून यायला हवं, काळीज दाटून यायला हवं आपलं.. पण तसं काहीच न होता चीड, संताप, तिरस्कार, किळसं वाटू लागलीय..

असं होतंय याचं कारण यांना ‘लोकसेवा’ करायची नसून काहीही करून सत्ता व त्या सत्तेतून आपल्या पुढल्या कितीतरी पिढ्यांसाठी प्रचंड माया जमवायचीय हे सर्वांनाच कळून चुकलंय आता (तुमच्या पुढच्या पिढ्या निकम्म्याच निपजणार याचा केवढा हा तुमचा आत्मविश्वास..!) आणि म्हणून ह्यांची पारदर्शी कारभार, काय, कटोरा काय नि यू शुड नो कायची नाटकं सुरू आहेत हे का आम्हाला समजत नाही? आम्हा मतदारांना तुम्ही सर्व काय मुर्ख समजलात काय? तुमची भांडण पाहून लोण्याचा गोळा नि त्यासाठी भांडणाऱ्या दोन गबर बोक्यांची गोष्ट आठवतेय..सत्तेच्या व त्यातून होणाऱ्या विनासायास ‘लक्ष्मीदर्शना’च्या लोण्याच्या स्वार्थी लालसेने चाललंय हे सारं हे कळतंय आम्हाला व म्हणून आम्हाला काही तुमच्याबद्दलच्या प्रेमाचं भरतं वैगेरे काही येत नाही तर चीड-संताप व तिरस्कारच वाटतोय..

आणि त्या शिवाजी महाराजांना का वेठीस घरलंय तुम्ही लोकांनी?..ते काय तुम्हाला निवडणूक लढवायचं ‘कॅपिटल’ वाटलंय की काय? अरे महाराष्ट्राचं दैवत आहे ते, काय तुम्ही त्यांची दशा करताय याचं तरी भान आहे का तुम्हाला? महाराजांवर तुम्ही तुमचा काॅपिराईट सांगताना अखिल महाराष्ट्राचा व पर्यायाने देशाचा तुम्ही अपमान करताय याची तरी जाणीव आहे का तुम्हाला? कि सत्तेसाठी एवढे आंधळे-बहिरे झालात? आणि आम्हा मतदारांचं काय? आम्हाला कोण हवंय यापेक्षा काय हवंय याचा कधीतरी कानोसा घ्यावासा वाटला का तुम्हाला?

सर्वदणं कंटाळलेत आता. तुम्हालाच नव्हे, तर एकूणच राजकारणाला आणि तुम्हा राजकारण्यांना..हे असंच चालू राहीलं तर मात्र कठीण आहे, जनता चिडून उठाव करणार नाही याच्या भ्रमात राहू नका, जनतेच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका. वेळीच सावध व्हा. अन्यथा..

या निवडणूकीत मी तरी NOTA वापरण्याचं नक्की केलंय..मत फुकट जाईल आणि असंही तुम्हाला दिल्यावर तरी तुठे सार्थकी लागणार आहे, फुकटच जाणार आहे..फरक एकच, की मी NOTAचा पर्याय पूर्ण शुद्धीत वापरणार व तसं करताना तुमच्या कोणाहीबद्द्लच्या प्रेमाची बेशुद्धी मला नसेल. NOTA वापरताना माझं मत फुरट जाणार याची मला पूर्ण जाणिव असेल आणि तुम्हापैकी कोणालाही मत देतांना काही तरी सत्कार्य करतोय अशी स्वत:ची केलेली फसवणूक तरी नसेल..

-नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..