नवीन लेखन...

किचन क्लिनीक – जायफळ

जायफळ हा भारतीय स्वयंपाकामध्ये वापरला जाणारा मसाल्याचा पदार्थ.
गोडाची खीर असो साखरभात असो जायफळ घातल्या शिवाय त्यांना मजा नाही.गरम मसाला असो कि दिवाळीच केला जाणारा फराळ ह्याच्या हजेरी शिवाय सगळेच फिके. मसाले दूध म्हणू नका की चहाचा मसाला सगळ्यांतच हा हवा.

असे हे सुगंधी जायफळ ह्याचा भला मोठा उंच सुगंधी व्रुक्ष असतो. आणी जायफळ हे त्याचे फळाचे बी.हे चवीला तिखट कडू असे मिश्र चवीचे असते.आणी उष्ण देखील असते.म्हणूनच शरीरातील वात व कफ दोष कमी करते.

चला आता ह्याचे काही औषधी उपयोग पाहूयात.

१)मुरूमांवर दुधात उगाळून ह्याचा लेप लावल्यास मूरुमं कमी होतात व चेहर्यावरचे डाग कमी होतात.

२)वारंवार उल्टया होत असतील तर जायफळ तांदूळाच्या धुवणातून उगाळून त्याचे चाटण द्यावे फायदा होतो.

३)लहान मुलांना पोटात थंडी साठून पातळ संडासला होते तेव्हा गाईच्या तूपामध्ये जायफळ व सुंठ समप्रमाणात उगाळून हे चाटण थोड्या थोड्या वेळाने देत रहावे.

४)पोट फुंगून जुलाब होत असल्यास जायफळ लिंबु रसात उगाळून ते चाटण मध्ये मध्ये चाटावे.

५)शरीरावर कुठल्या ही भागावर सुज आली असून तिथे दुखत असल्यास तिथे जायफळाचा लेप करावा.

जायफळ जर जास्त प्रमाणात सेवन केले तर पोटात आग होते,चक्कर येते,छातीत धडधड होते घूसमटल्यासारखे वाटते.

वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४

वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर
About वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर 202 Articles
वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर गेली १० वर्षे गोव्यामध्ये म्हापसा शहरात आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीकच्या माध्यमातून पंचकर्म, आहार मार्गदर्शन, सुवर्णप्राशन असे उपक्रम राबवीत आहेत. लेखनाची आवड असल्याने त्या विविध स्थानिक वृत्तपत्रातून आयुर्वेद व सामाजिक समस्यांशी निगडीत लेखन त्या करतात तसेच आरोग्यसंबंधित विषयांवर शाळा, कॉलेज इ मध्ये व्याख्यान देतात. आहार या विषयात जास्त रूची असल्याने व त्यावर अभ्यास आणि वाचन असल्याने त्यांनी आपला किचन क्लिनीक या सदराद्वारे ऑनलाईन लिखाण सुरु केले आहे. त्या आरोग्य भारती व जायंट्स ग्रूपच्या सदस्य देखील आहेत. आयुर्वेद शास्त्राचा जमेल तेवढा अभ्यास करून त्याचा प्रचार व प्रसार करण्याची त्यांची मनीषा आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..