नवीन लेखन...

“काटेकोर” पुणेकर

मागे पुण्याच्या बाहेर एका कार्यक्रमाला जायचा योग आला त्यावेळी त्या आयोजकांनी मेनू विषयी मत मागितलं …त्यावेळी त्यांना दिलेले हे उत्तर…

मेनू साधारण असा असावा-

वरण- भात, तूप, मीठ, लिंबू – त्याबरोबर शक्य असल्यास चमचाभर पूरण.

मसाले भात, पण त्यावर ताज्या ओल्या नारळाचं किसलेलं खोबरं आवश्यक…

पुऱ्या, अळुची शेंगदाणे-खोबरे घालून केलेली भाजी,

सुकी बटाटा भाजी, गोड-आंबट आमटी.

पापड-कुरडई. कोथिंबीर वडी किंवा घोसाळ्याची भजी.

ओल्या नारळाची कोथिंबीरीची चटणी, काकड़ी मोजक्या प्रमाणात दाण्याचा कूट व दही घातलेली कोशिंबीर.

चवी पुरतं पंचामृमत.

गोडात श्रीखंड किंवा बासुंदी.

मठ्ठा.

आता काही सूचना….लक्षपूर्वक वाचा..

आम्ही अंमळ तिखट कमी खातो तेंव्हा भरमसाठ मसाल्याचा मारा नको.

तेलात आंम्हास पोहावयाचे नाही, तेंव्हा तवंगाचा तलाव नको.

श्रीखंड असेल तर वाटी चमचा हवाच, उगाच श्रीखंड बचकन पानात वाढू नये…

आम्ही बोटाने चाटत श्रीखंड खात नाही…श्रीखंडाशी अशी प्रतारणा आम्हास मान्य नाही…

उगीचच गळेपडू आग्रह नसावा ( विनाकारण आग्रह करून वाढल्यास अपमान करण्यात येईल ) .

अळुच्या भाजीतील शेंगदाणे आख्खे असावेत, उगाच तुकडे तुकडे टाकू नयेत…

तसेच खोबरे देखील पाउण इंचा पेक्षा जास्त लांबीचे नको.

मठ्ठा हा प्रमाणशीर थंड असावा. त्यातील मीठ, साखर, ताक-पाण्याचे प्रमाण, आलं, कोथिंबीर योग्य प्रमाणातच हवी, त्यात मिरचीचे तुकडे घालणार असाल ते 5 ते 6 मी.मी. पेक्षा जास्त लांबीचे नकोत.

वरणाची डाळ एक-पात्रीच हवी, नाहीतर चव बदलते.

पापड-कुरडई मरतुकडे नको….त्याच्यातला कुरकुरीतपणा निघुन गेल्यास आमची कुरकुर सुरु होईल…

गोडात सुधारस ठेवल्यास तो एक तारीच असावा, लिंबू योग्य प्रमाणात असावे.

ताटातली भजी आणि भाजी ही चमचमीत हवी …तिखट नको…

त्यामुळे उगाच गुलाल उधळल्यासारख तिखट त्यात उधळू नये…

आता पान वाढावयाच्या सूचना –

पाट मांडून त्यासमोर छान (आटोपशीर) रांगोळी घालावी.. रांगोळी स्पर्धा असल्यासारखे वागू नये.

पानाच्या डाव्या बाजूला लोटी भांडे ठेवावे…

पान समोर ठेवून अगदी पुढचा भाग शून्य अंश पकडून मिठ वाढावे आणि

त्याच्या उणे पाच अंशावर लिंबू अन मग क्रमाने पाच-पाच अंशावर चटणी, पंचामृत, कोशिंबीर, लोणचे
वाढावे…

उणे 90 अंशावर पापड़, त्याखाली पूरी वाढावी.

मध्यभागी भाताची मुद असावी व सगळं वरण भसकन वाढू नये… वरणाचा ओघळ अजिबात येता कामा नये…

मुदाचा आकार प्रमाणशीर असावा…भसाडा नको…

वरण-भाता खाली मसाले भात वाढावा.

मसालाभाताच्या उजव्या बाजुलाच भाजी वाढलेली असावी..

आणि त्याच्या बरोबर वर आमटीची वाटी असावी.

उजव्या हाताला वरच्या साइडला 45 अंशावर गोडाची वाटी असावी व त्याच्या वर मठ्ठा वाटी असावी.

आमटी व भाजी गोडाच्या खाली असावी.

वर नमूद केलेल्यात काही त्रुटि असल्यास दुरुस्त कराव्यात, उगाच आमच्या चुका आंम्हाला दाखवू नये.

बस ऐवढेच अपेक्षित आहे. सूचना संपल्या असे समजू नये. प्रत्यक्ष जेवताना असतीलच.

आपला , ( नम्र वगैरे म्हणून मान खाली घालणे आवश्यक नाही )
“काटेकोर” पुणेकर

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..