नवीन लेखन...

इस्रोमधील आधुनिक ऋषी

१०४ उपग्रह एकाच वेळी प्रक्षेपित करण्याची अफाट कामगिरी केल्याबद्दल इस्रो च्या शास्त्रज्ञांचे कौतुक करावे तितके कमी आहे. इस्रो असू दे किंवा डी आर डी ओ यात काम करणारी शास्त्रज्ञ मंडळी म्हणजे आधुनिक ऋषी आहेत आणि सुदैवाने आजपर्यंतच्या सरकारांनी त्यांची हि स्वायतत्ता कायम राखली आहे. बहुसंख्य मंडळी दक्षिण भारतीय, बहुसंख्य मंडळी ब्राह्मण आणि अत्यंत धार्मिक. खऱ्या अर्थाने ज्ञानी आहेत आणि त्यामुळे मानवी ज्ञानाच्या कक्षा सुद्धा त्यांना ज्ञात आहेत. कर्मयोगी आहेत आणि त्यातूनच नकळत अध्यात्मिक प्रगती सुद्धा साधली गेली आहे आणि म्हणूनच मी फक्त निम्मित्तमात्र आहे, कर्ताकरविता तो ईश्वर आहे आणि म्हणून माझी प्रत्येक रचना त्याच्या चरणी अर्पण करून मी पुढे जातो आहे हि अस्सल योग्याच्या हृदयात असणारी भावना, आपल्या हृदयात बाळगून हि मंडळी कार्यरत असतात. काम करण्यासाठी मिळणारा अत्यल्प निधी, सरकारी खाक्यातूनच मिळणारे श्रेणीनिहाय वेतन जे तुलना केली असल्यास पाश्चात्य देशातील शास्त्रज्ञांच्या वेतनाच्या फक्त १० % भरेल त्यात सुद्धा समाधानी राहून, इतर केंद्रीय कर्मचारी ओव्हर टाईम सारख्या सगळ्या सुविधा घेत असताना घड्याळ्याच्या काट्याकडे न पाहता काम करणारे हे आधुनिक ऋषी पहिले कि आपण किती क्षुद्र आहोत याची जाणीव होते.
केंद्र आणि राज्य सरकार चालवत असणाऱ्या इतर कोणत्याही संशोधन संस्थाना टार्गेट नसते. तेथील मंडळी अक्षरशः पाट्या टाकत असतात. हे मी पाहून पूर्ण जबाबदारीने सांगतो आहे. मध्यंतरी औरंगाबाद मधील बाजरी संशोधन संस्थेच्या एका शास्त्रज्ञाच्या भेटीचा योग आला. मी त्यांना विचारले तुम्ही काय करता ? बाजारीवर संशोधन करतो. मग एखादे नवीन वाण विकसित करत आहात का ? नाही आम्ही संशोधन करतो. उत्पादकता वाढवण्यासाठी किंवा रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी संकरीत वाण तयार करत आहात का ? नाही आम्ही संशोधन करतो . इतकेच उत्तर ते देत होते. मी त्यांना विचारले तुम्हाला काही टार्गेट नसते का ? त्यावर त्यांनी नाही हे उत्तर दिले. आपल्या देशातील कृषीक्षेत्राची वाट लागण्यास असल्या कृषी संस्था आणि विद्यापीठे जबाबदार आहेत आणि या उलट इस्रो हि सतत नासाशी स्पर्धा करण्याच्या आणि त्यांना मागे टाकण्याच्या प्रयत्नात असते. डी आर डी ओ ला तर सतत चीन आणि अमेरिकेवर नजर ठेवून त्यांच्या तोडीची शस्त्रात्रे विकसित करावी लागतात आणि ती सुद्धा इंडियन प्राईस मध्ये. परंतु हि मंडळी जिद्दीने आणि राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन हे कार्य निरलसपणे करत असतात.

मंगलयान प्रकल्पावर मध्यंतरी डिस्कव्हरी च्यानेलने एक सुंदर वृत्तांत दाखवला. त्यात त्यांनी दाखवले कि ज्यावेळी मंगलयान हे मंगल ग्रहाच्या कक्षेत जाणार होते त्यावेळी काही काळ अश्या लोकेशन ला असणार होते कि त्या यानाला सूर्य अथवा पृथ्वी काहीही दिसणार नाही आणि तरीसुद्धा त्याला त्याचे को ordinate पृथ्वीशी सेट करावे लागतील. या टप्प्यावर जाऊनच यापूर्वीच्या मंगलयानांच्या मोहिमा अपयशी झालेल्या होत्या. इस्रो ने या साठी प्राचीन भारतीय ऋषींच्या ज्ञानाची मदत घेतली. वराहमिहीर हा प्राचीन astro फिजिशियन होता त्याने या परिस्थितीत तुम्ही तुमचे लोकेशन इतर ग्रहांच्या अभ्यासाने कसे ठरवावे याचे मार्गदर्शनपर लेखन केलेले आहे. ( त्याच्यामते तो देहातीत अवस्थेत या पद्धतीने अंतराळात संचार करू शकत असे आणि ते इतर ऋषींना सुद्धा साध्य होते ) त्याच्या गणितीय माहितीचा आधार घेऊन इस्रो मध्ये कार्यरत असणाऱ्या astro फिजिशियन शास्त्रज्ञांनी मंगलयानाचे परिभ्रमण ठरवले आणि त्यांचे ज्ञान किती परिपूर्ण असेल कि पहिल्याच प्रयत्नात भारताने हि मोहीम यशस्वी केली. हा संपूर्ण प्रकल्प अत्यल्प खर्चात पूर्ण करणे साध्य व्हावे म्हणून या मंडळीनी गोफणीच्या तत्वाचा वापर करून मंगलयान पृथ्वीच्या कक्षेबाहेर गेल्यावर अंतराळात अक्षरशः भिरकावून दिले. आणि तब्बल ३०० दिवस कोणत्याही इंधनाचा वापर न करता इंजिन बंद करून हे मंगलयान मंगळाजवळ दाखल झाले. या शास्त्रज्ञांच्या बुद्धीचे कौतुक करावे तितके थोडे आहे. भोवताली नकारात्मक वातावरण असताना सुद्धा सकारात्मक वृत्तीने प्रत्येक संकटाला प्रत्येक अल्प साधनांना एक संधी समजून आपल्या बुद्धीला आव्हान समजून त्यातून काही तरी असे अफाट घडवणाऱ्या या शास्त्रज्ञ मंडळीना आपण सामान्य भारतीयांनी लाख वेळा शीरसाष्टांग वंदन केले तरी सुद्धा ते कमीच असेल. या अश्या तमाम अग्नीदिव्यातून जाऊन हि मंडळी प्रकल्प पूर्ण करतात आणि कृष्णार्पणमस्तु भावनेतून त्याची प्रतिकृती ईश्वराला अर्पण करतात आणि नवीन जबाबदारी स्वीकारतात.

दुर्दैवाने आपल्या देशात पुरोगामी नावाची एक अत्यंत मनोविक्रृत जमात अस्तित्वात आहे त्यांना प्रतिकृती मंदिरात अर्पण करणे सुद्धा त्यांच्या पुरोगामी पणाचा अपमान वाटतो आणि ते या शास्त्रज्ञ मंडळीना अंधश्रद्धा पसरवत आहेत म्हणून फैलावर घेतात. यांच्या विद्वत्तेच्या आणि ज्ञानाच्या एक शतांश पातळीवर नसणारी अर्धवट अक्कल असणारी मंडळी अशी टीका करताना पाहून मन खरच विदीर्ण होते.

असो. परत एकदा आधुनिक ऋषी मंडळींचे हार्दिक अभिनंदन आणि आम्हाला विश्वास आहे असे अभिमानाचे क्षण या राष्ट्राच्या नशिबी तुमच्यामुळे वारंवार येणार आहेत .

(अतिशय सुंदर असलेल्या या लेकाचे लेखक कोण आहेत ते माहित नाही. Whatsapp वरुन आलेला हा लेख वाचकांसाठी प्रकाशित करत आहोत)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..