नवीन लेखन...

आला हिवाळा..

सध्या वातावरणातील गुलाबी थंडी आपल्याला अनुभवायला मिळते. हिवाळा सुरू झाल्याची कुणकुण आपल्याला वाढलेल्या भूकेमुळे समजते. हिवाळ्यात आपला जठराग्नी बलवान होतो. म्हणून या दिवसांत खाण्यात पचायला जड पदार्थ वापरले तरी ते बाधाकारक ठरत नाही. प्रामुख्याने या दिवसात गोड चवीचे पदार्थ अधिक खाण्यात असावेत (मधुमेही रुग्णांसाठी हे लागू नाही) विविध प्रकारची पक्वान्ने आपण हिवाळ्यात सहज पचवू शकतो. रव्याची खीर, दुधाची बासुंदी, श्रीखंड अशी विविध पक्वान्ने या दिवसात लाभदायक ठरतात.
दूध आणि तुपाचे पदार्थ, शुद्ध मिठाई यांचा उपयोग आपल्याला करता येतो. दूध आणि तूप हे गायीचे असावे. या दिवसांत भूक खूप लागते. त्यामुळे योग्य वेळी आहार घ्यावा. उपवास करणे शक्यतो टाळावे. खूप तिखट नसलेले पण मसालेदार असे पदार्थही या काळात आपण खावेत. दिवाळीतला फराळ हे याचे चांगले उदाहरण आहे.

फराळाचे सगळे पदार्थ हे चविष्ट, थोडे तिखट आणि आपली पचनशक्ती वाढविणारे असे असतात. शेव, चिवडा, चकली असे पदार्थ आणि जोडीला रवा-बेसणाचे लाडू, अनारसे, करंजी यांचा सुरेख समन्वय या दिवसात योग्य प्रमाणात केल्यास तो आरोग्यदायी ठरतो. या दिवसांत भूक चांगली असली आणि पचनशक्ती चांगली असली तरीही आईस्क्रिम, शीतपेय, फ्रिजचे पाणी असे अतिथंड पदार्थ घेणे टाळावेत, अन्यथा त्रासदायक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.

भारतीय वातावरणा प्रमाणे वर्षभरात येणाऱ्या सहा ऋतुंमध्ये प्रत्येक ऋतुत बाहेरील वातावरणाचा परिणाम आपल्या तहानेवर होत असतो. त्यानुसार आपले प्रत्येक ऋतुतील पाण्याचे प्रमाण आणि त्याचे स्वरूपही अवलंबून असते, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. हिवाळ्यातील हेमंत आणि नंतरचा शिशीर हे दोन्ही ऋतुही यास अपवाद नाहीत. हिवाळ्यात मुळातच आपल्याला तहान कमी लागते. त्यामुळे एरव्हीपेक्षा आपण पाणी कमी प्यावे. तहान भागेल इतकेच प्यावे, त्यापेक्षा जास्त पाणी प्याल तर मग सर्दी, खोकला, कफ असे विकार व्हायला लागतात.

पाण्याचेही अर्जीर्ण होते. पाणी जास्त प्यायल्याने सकाळी पोट साफ होते, असा अनेकांचा गैरसमज आहे. त्यासाठीही भरपूर पाणी पिण्याची प्रथा सगळ्या ऋतुमध्ये आपल्याकडे हल्ली सुरू झालेली आहे. पण ही प्रथा आरोग्यदायी नाही. हिवाळ्यात बाहेर वातावरण थंड असल्याने फ्रिज, माठ यांतले पाणी टाळणे चांगले. त्याऐवजी थोडीशी सुंठ घातलेले साधे पाणी या काळात प्यावे. ते हितकर असते. कफाचा त्रास ज्यांना हिवाळ्यात होतो, त्यांनी या काळात पाणी भांडे गरम करून आणि मर्यादेत प्यावे. थोडे उकळून पाणी प्यायल्यास त्याचाही फायदा होतो. विशेषत: एक ग्रॅम सोन्याचा दागिना एक लिटर पाण्यात टाकून उकळावा. मग गाळून घेऊन दिवसभर तेच पाणी प्यावे, असे सोन्याचे पाणी हे आपली प्रतिकारशक्ती वाढवते.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ : इंटरनेट / लोकसत्ता

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..