नवीन लेखन...

आदरणीय बाबासाहेब..

आदरणीय बाबासाहेब..

तुम्ही आयुष्यातील पहिले कर्ज
पुस्तकांसाठी घेतले होते,
असे एकदा कानावर आले होते.
ते आम्हीही जयंती मयंतीला सांगतो.
अगदी टाळ्यांच्या कडकडाटात !!
पण चुकून कधीही
पुस्तकाला हात लावित नाहीत.

मला सांगा,
पुस्तकांनी कुठे पोट भरते का?
इतर पुस्तकांचं जाऊ दे
तुमच्या दक्ष निगराणीखाली तयार झालेली
भारताची राज्यघटना तरी
उठ-सुट तुमचं नांव घेणाऱ्या
किती जणांच्या घरी आहे?
आणि आहे त्यातील किती जणांनी
ती उघडून वाचली आहे?
याचं उत्तर नकारार्थीच येईल..

पुस्तकावरच घसरलो तर..
पोटासाठी नामांतर चळवळ,
पोटासाठी बाबासाहेबांचा विचार,
पोटासाठी राजकीय दलाली,
पोटासाठी जयंती-पुण्यतिथी,
पॊटासाठी खास आपला एक मॉब,
असे एक ना भाराभर विषय पडलेत की..,
त्यात पुस्तकांची रद्दी कशाला आणखी..!!

बाबासाहेब, तुमची शिकवण
कुणालाच अंगीकारायला
नको आहे.
कारण ती मूल्यांवर चालायला शिकवते.
आणि त्या ‘मुल्या’चा अर्थ
पैसा असाही दिसतोय डिक्शनरीत;
आणि तो कमावण्याचा तुम्ही एक ‘ब्रान्ड’..
एक चलनी नाणं..!

तुमच्या शिकवण, तुमची मुल्य आम्ही विसरलेली नाही,
वर्षातून दोनदा, जयंती आणि पुण्यातिथीला आणि पांच वर्षांतून एकदा
निवडणूकांच्या वेळी
त्याची आम्ही हमखास आठवण काढतो बाबासाहेब..
जशी आज काढलीय..!
आम्ही कुठे विसरलोत तुम्हाला?

— नितीन साळुंखे

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..