नवीन लेखन...

हिमोग्लोबिन – भाग २

हिमोग्लोबिनमधला हिम हा भाग फुफ्फुसातील ऑक्सिजनचे परिवर्तन ऑक्सिहिमोग्लोबिनमध्ये करतो. उतीमध्ये पोहोचल्यावर ऑक्सिजनचा दाब जिथे कमी असेल व कार्बनडाय ऑक्साईडचा दाब वाढला असेल तिथून तो ऑक्सिजनबरोबर मुक्तक होतो. त्यानंतर कार्बनडाय ऑक्साईडबरोबर संयोग होऊन फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो व कार्बनडाय ऑक्साईड वेगळा होतो आणि उच्छ्वासाद्वारे शरीराबाहेर पडतो. हिमोग्लोबिनमार्फत ऑक्सिजन घेणे आणि सोडणे ही प्रक्रिया सतत सुरू असते.

बोनमॅरोमधील रंगपेशींना लोह आणि ऑक्सिजनचा पुरवठा करणारे रंगद्रव्य म्हणजे हिमोग्लोबिन. याचा रंग लाल असतो. हिमोग्लोबिन म्हणजे प्रथिनांचे एक जटील रूप आहे. ज्यामध्ये 96 टक्के ग्लोबिन आणि 4 टक्के हिम असते.

हिमोग्लोबिनचे कार्य

फुफ्फुसांतून उतींना ऑक्सिजन पुरवणे आणि उतींमधून कार्बनडाय ऑक्साईड फुफ्फुसामध्ये पोहोचवणे हे हिमोग्लोबिनचे महत्त्वाचे कार्य आहे. हिमोग्लोबिनमधला हिम हा भाग फुफ्फुसातील ऑक्सिजनचे परिवर्तन ऑक्सिहिमोग्लोबिनमध्ये करते. उतीमध्ये हे ऑक्सिहिमोग्लोबिन पोचल्यावर ऑक्सिजनचा दाब जिथे कमी असेल आणि कार्बनडाय ऑक्साईडचा दाब वाढला असेल तिथून ऑक्सिजन मुक्त होतो. त्यानंतर कार्बनडाय ऑक्साईडबरोबर संयोग होऊन फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो त्यानंतर कार्बनडाय ऑक्साईड वेगळा होतो आणि उच्छ्वासाद्वारे शरीराबाहेर पडतो. हिमोग्लोबिनमार्फत ऑक्सिजन घेणे व सोडणे ही प्रक्रिया सतत सुरू असते.

हिमोग्लोबिनशी निगडित समस्या

सामान्यपणे रक्तागल्पता, पोषण कमी, रक्त.वाहिन्यांच्या समस्या, ट्यूमर आदी समस्या हिमोग्लोबिनच्या पातळीशी निगडित असतात.
रक्ता्ल्पता हा हिमोग्लोबिनशी निगडित रोग सामान्यपणे पाहायला मिळतो.

रक्ता्मधील हिमोग्लोबिनचे प्रमाण

पुरुष : 14 ते 17 ग्रॅम प्रति 100 मिली
स्त्री : 13 ते 15 ग्रॅम प्रति 100 मिली
लहान मुले : 14 ते 20 ग्रॅम प्रति 100 मिली

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी दिवसाकाठी एक सफरचंद खाल्ल्यास हिमोग्लोबिनचे प्रमाण कायम राहते. लीची हे फळ आरोग्यास अतिशय लाभदायक आहे. लीचीमध्ये बीटा कॅरोटीन, राईबोफ्लेबिन, नियासीन आणि फॉलिक अॅ सिड किंवा ‘बी’ जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तनपेशी वाढतात तसेच पचनही सुलभ होते. लाल रक्तबपेशींच्या वाढीसाठी ही जीवनसत्त्वे शरीरास मिळणे अत्यावश्यक आहेत.

आहारात बीटाचा समावेश अवश्य करावा त्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढते. त्यात फॉलिक अॅासिड, आयर्न, तंतुमय पदार्थ आणि पोटॅशिअमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे लाल रक्त पेशींची संख्या वाढते. त्याशिवाय डाळिंबामध्येही लोह आणि कॅल्शियमसह प्रथिने, कार्बोहायड्रेट आणि तंतूमय पदार्थ यांचे प्रमाण जास्त असते. घरात वापरला जाणार गूळ हादेखील हिमोग्लोबिन वाढवण्याचा उत्तम उपाय आहे. गुळामध्ये लोह आणि फॉलिक अॅळसिडसह इतरही ‘बी’ जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे लाल रक्त पेशींचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढते. नियमित व्यायामामुळे शरीर स्वतःच हिमोग्लोबिनची निर्मिती करते. कॉफी, चहा, कोकाकोला, वाईन, बीअर यांच्यामुळे शरीरात लोह शोषण्याचे प्रमाण कमी होते. हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असेल तर या पदार्थांचे सेवन कमी करा. ‘क’ जीवनसत्त्वाची कमतरता असेल तर हिमोग्लोबिनची पातळी खालावू शकते. कारण ‘सी’ जीवनसत्त्वाची कमतरता असेल तर लोह शोषले जात नाही. त्यामुळे ‘सी’ जीवनसत्त्व असणाऱे पदार्थ खाल्ल्यास हिमोग्लोबिनच्या पातळीत वाढ होते. आपल्या आहारात पोषण तत्त्वांची कमतरता असल्यास हिमोग्लोबिनच्या पातळीत झपाट्याने घट होते. त्यासाठी प्रथिने आणि लोह हे घटक असणार्याा पदार्थांचे सेवन करावे. अंडे, डाळ, ज्यूस यांचे नियमित सेवन केल्यास रक्तातल्पता कमी होते. धूम्रपान आणि दारू पिणे या गोष्टींपासून दूर राहिल्यास हिमोग्लोबिनची पातळी राखता येते. सकाळच्या ताज्या स्वच्छ हवेत व्यायाम केल्यासही आरोग्य चांगले राहते. वजनाच्या प्रमाणात माणसाच्या शरीरात लोहाचे प्रमाण हे तीन ते पाच ग्रॅम असते; पण हे प्रमाण कमी झाले तर शरीराला हिमोग्लोबिनची कमतरता भासते. त्यामुळे शरीरातील पेशींना मिळणारा ऑक्सिजन कमी होतो त्यामुळे शरीराराला पुरेशी ऊर्जा मिळत नाही. त्यामुळे व्यक्तीा अॅसनिमियाग्रस्त होते. त्याशिवाय बी-12 जीवनसत्त्वाची कमतरता आणि फॉलिक अॅुसिडची कमतरता असल्यासही व्यक्तीम अॅतनिमियाग्रस्त होते.

पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अॅानिमियाचे प्रमाण जास्त असते. लवकर थकवा येणे, चक्कतर येणे, त्वचा पिवळी पडणे, सततची डोकेदुखी ही अॅ निमियाची लक्षणे असतात.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. डॉ. रोहिणी भगत

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..