नवीन लेखन...

“माणूस” म्हणून….!

मी “बाबासाहेबांवर” काही लिहिले..
लाेकांनी मला फोन करून विचारले
“तुम्ही बौध्द किंवा दलित आहात का…?”

मी आपल्या ” शिवछत्रपतींवर”काही लिहिले..
लाेकांनी मला फोन करून विचारले
“तुम्ही मराठा आहात का…?”

मी आपल्या ” सावरकर, टिळक यांच्यावर”काही लिहिले..
लाेकांनी मला फोन करून विचारले
“तुम्ही ब्राह्मण आहात का…?”

मी “फुलेंवर” काही लिहिले
लाेकांनी मला फोन करून विचारले
“तुम्ही माळी आहात का..?”

मी “अहिल्या देवींवर” काही लिहीले
लाेकांचा मला फोन आला अन् विचारले
“तुम्ही धनगर आहात का..?”

मग मी “माणसावर” काही लिहिले
मला कोणाचाही फोनच आला नाही…
कमेंट बाॅक्स मधेही काहीच प्रतिसाद नाही..
वाट पाहतोय अजून….
“ती” माणसे गेली कुठे…?

माणसाने स्वतःतला माणूस मारून..
माणूसकी दूर ठेवून…
फक्त आणि फक्त “जात” जिवंत ठेवली आहे..
सर्वांनी गाड झोपेतून उठा.. आणि
एकमेकांना माणूस म्हणून बघा….माणूस म्हणून….!

– एक सुजाण माणूस
– एक भारतीय..! जय हिन्द..!

— गणेश कदम,
कुडाळ सिंधूदुर्ग

Avatar
About गणेश कदम 48 Articles
पुणे येथे वास्तव्य असलेले गणेश कदम हे विविध विषयांवर समाजमाध्यमांतून लिहित असतात. ते टेक महिंद्र या कंपनीत वरिष्ठ सल्लागार आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..